• Wed. Mar 11th, 2026

    Devendra Fadnavis: …तर साधुग्राम उभारायचे कुठे? वृक्षतोडीबाबत राजकारण अयोग्य; मुख्यमंत्र्यांची टीका

    Devendra Fadnavis: …तर साधुग्राम उभारायचे कुठे? वृक्षतोडीबाबत राजकारण अयोग्य; मुख्यमंत्र्यांची टीका

    Devendra Fadnavis: ​​नाशिकच्या तपोवनात साधुग्रामसाठी १,८२५ वृक्षांच्या तोडीविरोधात वृक्षप्रेमींकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच सरकारची भूमिका मांडली.

    cm devendra fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: प्रयागराजचा कुंभमेळा पंधरा हजार हेक्टरवर होतो, तर नाशिकमध्ये अवघ्या साडेतीनशे एकर जागेवर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यामुळे तपोवनातील ही जागाही मिळाली नाही, तर सिंहस्थ होणार कसे, वृक्षतोड न करता साधुग्राम उभारायचे कुठे, असा सवाल करीत साधुग्रामच्या आरक्षित जागेतील वृक्षतोडीबाबत राजकारण अयोग्य आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, सेलिब्रेटींसह राजकीय पक्षांना मंगळवारी सुनावले.

    सिंहस्थासाठी वृक्ष कशाला तोडायचे ही त्यांची भूमिका योग्य आहे, असे नमूद करत यात मधला मार्ग काढावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. धर्माला अफूची गोळी म्हणणारेच या आंदोलनस्थळी दिसत असल्याचे शरसंधानही त्यांनी केले. त्यामुळे वृक्षतोडीविरोधातील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी या आंदोलनाला पाठिंबा देणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे , रोहित पवार यांनाही सुनावले.

    Maharashtra Timesपैशांचाच बोलबाला! मताला 5 ते 25 हजारांचा ‘भाव’; त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थाआधीच मतदारांचं ‘चांगभलं’
    पालिकेच्या मोहिमेवर खापर
    तपोवनाची सन २०१५-२०१६ ची गुगल इमेज बघितली, तर त्या ठिकाणी कुठलीही झाडे नव्हती. परंतु, या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी २०१७-१८ मध्ये महापालिकेने या जागेवर विचार न करता वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. हे चूक आहे असे म्हणता येणार नाही. परंतु, परत बारा वर्षांनी ही जागा साधुग्रामसाठी वापरावी लागणार आहे, याचा विचार न करता या जागेवर अतिघन पद्धतीने वृक्ष लागवड केली गेली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
    Maharashtra TimesNashik News: बिऱ्हाड आंदोलकांकडून अन्नत्याग; पाच दिवसांपासून सहा जणांचे बेमुदत आंदोलन
    मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य
    मागील २५-३० वर्षांपासून मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण घोषित केलेल्या निवडणुका पुढे जात असल्याचे पहिल्यांदाच पाहतोय. निवडणुकांचे निकालही पुढे जात आहेत. ही पद्धत योग्य नाही. केवळ २४ ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत, म्हणून सगळी मतमोजणी पुढे ढकलणे मला तरी योग्य वाटत नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा