Neelam Gorhe On Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर, बीडच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली.
छत्रपती संभाजीनगरात समर्थनगर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यावेळी उपस्थित होते.
Devendra Fadnavis: लखपती दीदी योजना अमलात आणणार; फडणवीसांची मोठी घोषणा, ‘लाडकी बहीण’बाबत म्हणाले…
तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे, असे सांगत निवडणुकीतील प्रचारसभेत अजित पवार मतदारांकडे मतांची मागणी करीत आहेत, याकडे पत्रकारांनी गोऱ्हे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हा टोला लगावला. तिजोरीला एकच किल्ली नसते, दुसरी किल्लीही असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करण्याची मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. आर्थिक तरतुदीचे कारण सांगून आनंदाचा शिधा बंद करण्यात आला. केवळ वीस कोटी रुपयांसाठी हे करण्यात आले याचा खेद वाटतो, असे त्या म्हणाल्या.
आधी IAS अधिकाऱ्याचा रुबाब, सत्य समजताच बारा वाजले; एका चुकीमुळे तोतया महिलेचं बिंग फुटले, प्रकरण काय?
‘मतभेद आहेत, मनभेद नाहीत’
महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची पळवापळवी होऊ नये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून सांगितले. मात्र त्यानंतरही पळवापळवी होतच आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकशाहीत अशा गोष्टी घडतच असतात. महायुतीत मतभेद असले तरी मनभेद झालेले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
