Gramsevak Ends Life: सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात एका ग्रामसेवकाने अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला.
उपचारादरम्यान मृत्यू
प्रकाश बाविस्कर यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी बार्शी येथील राहत्या घरी गळास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. घरात त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या खोलीत खुर्ची पडल्याचा आवाज आला आणि त्यांच्या पत्नी खोलीकडे धावल्या. त्यांनी धावपळ करुन लगेचच त्यांना रूग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
पुण्यातून मुलीला पळवून नेलं, नंतर पोलिसांना चकवा दिला, पुण्याच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशात जावून आरोपींच्या नांग्या ठेचल्या
अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप
प्रकाश बाविस्कर हे बार्शी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर यांना काही वरिष्ठ अधिकारी काही कारणावरून सतत छळत होते. काही दिवसापूर्वी त्यांना दप्तर तपासणी करायची आहे, असे म्हणत त्यांच्याकडे पैशाचीही मागणी करण्यात आल्याचे आरोप कुटुंबियांनी केला आहे. सतत हे अधिकारी पैसे मागत असल्याचेही कुटुंबियांनी सांगितले आहे.
मृतदेह स्वीकारण्यास मनाई
मृत प्रकाश बाविस्कर यांच्या पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखला करता येत नसल्याचे सांगतिले. पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले होते. बुधवारी सकाळी बार्शी ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
संतोष देशमुखांपेक्षा भयंकर कांड, उमेश पाटलांचे बाळराजेंवर गंभीर आरोप, कठोर शिक्षेची मागणी
पोलिसांचे गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन
शवविच्छेदन झाल्यानंतर बार्शी ग्रामीण रुग्णालयात कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला.जोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून प्रकाश बाविस्कर यांच्या कुटुंबियांना अधिकाऱ्यांना विरोधात गुन्हा दाखल आश्वासन दिले त्यानंतर परिस्थिती निवळली.
