• Tue. Jun 16th, 2026
    घंटो का प्रवास मिनटो में! मुंबई ते वाढवण प्रवास 60 मिनिटांवर, कसा असेल नवा मार्ग?

    Mumbai News : उत्तन-विरार सागरी सेतू हा विरारजवळील चिखल डोंगरी गावाजवळ संपणार असून याच गावाच्या थोडे पूर्वेला शिरसाड येथून वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग जात आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दक्षिण मुंबईला प्रस्तावित वाढवण बंदराशी थेट जोडण्यासाठी ३०० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. याअंतर्गत एमएमआरडीएच्या उत्तन-विरार सागरी सेतूची वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाला जोड दिली जाणार आहे. यामुळे मुंबई ते वाढवण हा प्रवास तासाभरात होऊ शकेल.

    कसा असेल मार्ग?

    जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून (जेएनपीए) देशातील सर्वाधिक क्षमतेचे वाढवण बंदर उभारले जाणार आहे. या बंदराच्या संलग्नतेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) वाढवणजवळील वरोर ते तवा जंक्शन असा विशेष महामार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग एनएचएआयकडूनच बांधल्या जाणाऱ्या वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. याच द्रुतगती मार्गाला आता उत्तन-विरार सागरी सेतूची जोड दिली जाणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांगितले. उत्तन-विरार सागरी सेतू हा विरारजवळील चिखल डोंगरी गावाजवळ संपणार आहे. तर याच गावाच्या थोडे पूर्वेला शिरसाड येथून वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग जात आहे. यामुळेच चिखल डोंगरी ते शिरसाडदरम्यान ३०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारून उत्तन-विरार सागरी सेतू जोडला जाणार आहे. ही जोड एनएचएआयच उभी करणार असून यासंबंधी केंद्र व राज्य सरकारदरम्यान चर्चा झाल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
    Maharashtra TimesRitumoni Roy : प्रसिद्ध महिला पत्रकाराने आयुष्य संपवलं, न्यूजरुममध्येच बॉडी सापडली, लग्नाच्या 15 दिवस आधी टोकाचं पाऊल, थरारक CCTV फूटेज
    ‘सागरी किनारा मार्ग, तीन सागरी सेतू, जोड रस्ता, द्रुतगती मार्ग ते विशेष महामार्ग हा संपूर्ण रस्ता १२० किमी लांबीचा असेल. मात्र हा रस्ता थेट असल्याने दक्षिण मुंबईतून वाढवण बंदर तासाभरात गाठता येणार आहे. तसेच यामुळे विरारपुढे वाढवणपर्यंत सागरी किनारा मार्ग बांधण्याच्या हजारो कोटींच्या खर्चात बचत होईल,’ असे एमएमआरडीएतील सूत्रांनी सांगितले.
    Maharashtra TimesSmriti Mandhana Palash Muchhal Wedding : पलाश म्हणाला, आता मला तोपर्यंत फेरे घ्यायचे नाहीत, जोपर्यंत… स्मृतीच्या सासूबाईंनी सगळं सांगितलं, हळद लागल्याने नवरदेवाला…

    कोंडीवर भुयारी उतारा

    दुसरीकडे, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आम्ही मुंबईत ‘पाताळलोका’त जाळ्याची निर्मिती करीत आहोत, वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते आणि भुयारी मार्ग तयार केले जातील, त्यामुळे मुंबई वाहतूक कोंडीमुक्त होऊन मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा