IIT Mumbai : आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नसणे चांगलेच असल्याचे वादग्रस्त विधान जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहातील कार्यक्रमात विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी क्वाण्टम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड आदी विषयांवर भाष्य करताना आयआयटी मुंबईबाबत हे विधान केले. ‘आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रास बद्दलही माझ्या याच भावना आहेत,’ असे वक्तव्य जितेंद्र सिंह यांनी केले.
AI आणि खाजगी कोचिंगचा विद्यार्थ्यांवर परिणाम? आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनंतर संसद समितीचा तातडीचा आढावा
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशात मराठी-अमराठी हा मुद्दा ऐरणीवर असताना केंद्र सरकारमधील एका मंत्र्याने हे वक्तव्य केल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रेक्षकांमध्ये हलक्या स्वरात याबाबत नाराजीचा सूर उमटल्याचे चित्र दिसले.
ST उशिरा आली तर थेट कारवाई! विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास आगार व्यवस्थापक निलंबित; हेल्पलाइन सुरू
दुजाभाव का ?
भारतीय तंत्रविज्ञान संस्था, मुंबईच्या (आयआयटी) अधिकृत नावात अजूनही आयआयटी बॉम्बे आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत ‘परकीयां’च्या खुणा पुसण्यासाठी विविध आस्थापनांची, शहरांची नावे बदलली आहेत. अगदी नुकतेच राज्यात औरंगाबाद, उस्मानाबद आणि अहमदनगर या जिल्ह्यांची आणि शहरांची नावे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि अहिल्यानगर अशी करण्यात आली. अगदी मुंबईतही कर्नाक पुलाचे नाव सिंदूर पूल आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यात आले. त्यामुळे मुंबईशी दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
