Pune Sahil Gothe Friends Accident News : ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळ असलेल्या अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट दरीत कोसळले
उत्तमनगर परिसरातील सहा मित्र 17 नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कोकणात फिरायला निघाले होते. ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळ असलेल्या अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एमएच 12 वाय एन 8004 या क्रमांकाची थार दरीत कोसळल्यानंतर वाहनाचे अवशेष दूरवर पसरण्याइतका अपघात भीषण होता. या घटनेने रायगड आणि पुणे परिसरात शोककळा पसरली आहे.
कष्टाळू साहिलने ब्रँड बनवला
या अपघाताने पुण्यातील उत्तम नगर परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात मृत्यू झालेला साहिल गोठे याची ती थार गाडी होती. 24 वर्ष वय असणारा साहिल हा अत्यंत होतकरू आणि कष्टाळू मुलगा होता. घरी अठरा विश्व दारिद्र्य असल्याने साहिलने व्यवसायामध्ये उतरून आपली परिस्थिती बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. सुरुवातीला तो राहत असलेल्या परिसरात त्यांनी मोमोजचा एक स्टॉल सुरू केला. दिवस-रात्र कष्ट करण्याची तयारी ठेवून साहिल हा व्यवसायात उतरला होता. हळूहळू साहिलचा स्टॉल हा एक ब्रँड बनला. त्याने पुण्यातील इतर दोन ठिकाणी अशा एकूण तीन ठिकाणी मोमोजचे स्टॉल सुरू केले.
Solapur News : अहो आपल्या हर्षला अॅडमिट केलंय… बाबा धावत पोहोचले, 23 वर्षाच्या लेकाचा अकस्मात मृत्यू, कारण ऐकून महाराष्ट्र हळहळला
आधी फ्लॅट घेतला मग गाडी
ग्राहकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. ज्या उद्देशाने साहिल गोठे व्यवसाय करण्यासाठी मैदानात उतरला होता तो त्याचा उद्देश हळूहळू साध्य होत होता. ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याने पैसा सुद्धा यायला लागला होता. यामुळे साहिलची घरची परिस्थिती देखील बदलत चालली होती. गेल्या वर्षी साहिलने एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता. घर झाल्यानंतर साहिलला त्याच्या स्वप्नातली थार गाडी विकत घ्यायची होती.
Kolhapur News : बेड बदलताना चक्कर; सिझरनंतर तिसऱ्याच दिवशी मातेचा मृत्यू, चिमुकला आईच्या मायेला पोरका, जाधव कुटुंब शोकसागरात
मित्रांसोबत मृत्यूच्या कवेत
मेहनत जिद्द चिकाटीच्या जोरावर साहिलने आपलं ते स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. अपघात होण्याच्या वीस दिवस आधीच साहिलने नवी कोरी काळी थार घेतली होती. अनेक वर्षापासून व्यवसाय करत असल्याने स्वतःसाठी कधीच वेळ मिळाला नाही. त्यामुळे आपली नवीन गाडी घेतली आणि मित्रांसोबत कोकण ट्रिप करायचं ठरलं. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. व्यस्त कामकाजातून थोडासा निवांत वेळ काढावा म्हणून साहिल कोकणच्या दिशेने निघाला मात्र तो कधीही परत न येण्यासाठीच. मात्र ज्या गाडीचं स्वप्न त्यांनी पाहिलं त्याच गाडीने झालेल्या अपघातात त्याचा आणि त्याच्या मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे पुणे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
