Uddhav Thackeray On Eknath Shinde: राज्यातील भाजपच्या नेत्यांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
मुंबई शिक्षक आमदार ज. मो अभ्यंकर यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट बोर्डच्या समारंभारत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर त्यांच्या नाड्या आवळल्या जातात, हे आपण वाचतो. आता कहर म्हणजे त्यांच्यातच आपापसात नाड्या लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आज तुम्ही पेपरमध्ये वाचले असेल, त्यात असे लिहिले आहे की बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेले होते.
ठाण्यात रविंद्र, मंत्रालयात देवेंद्र; CMच्या एका खेळीनं शिंदेसेनेत खळबळ; तोच खेळ पुन्हा सुरु
ही लाचारी का आणि कशासाठी?
जर त्यांना त्या वयात योग्य शिक्षण मिळाले असते तर ही परिस्थिती आली नसती, असा टोला उद्धव यांनी लगावला. घरातून योग्य संस्कार व्हावे लागतात. संस्कारातून सर्व गोष्टी येत असतात. वडिलांनी घोटाळा केला की मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चिमटा काढला.
महाशक्ती पाठिशी ते महाशक्ती लागली पाठी! शिंदेसेना अडचणीत; भाईंकडे आता एकच पर्याय
बाप कोण आहे, तेच कळत नाही
मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली.“गेले ३-४ वर्षे महापालिकेत बाप कोण आहे, तेच कळत नाही. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे आहेत. सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देत नाही’, असेही उद्धव ठाकरे उपहासात्मकपणे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहनही सर्व आमदारांना केले.

