• Sun. Jun 14th, 2026

    बाबा मला मारलं, तक्रार घेऊन कुणीतरी दिल्लीला गेलं; अमित शहांच्या भेटीवरुन ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं

    बाबा मला मारलं, तक्रार घेऊन कुणीतरी दिल्लीला गेलं; अमित शहांच्या भेटीवरुन ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं

    Uddhav Thackeray On Eknath Shinde: राज्यातील भाजपच्या नेत्यांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

    shinde vs thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : बाबा मला मारले असे सांगत एक कोणी तरी दिल्लीत गेले आहे’, अशा शब्दांत उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली. चांगल्या शिक्षकांचे शिक्षण मिळाले असते तर ही लाचारी आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

    मुंबई शिक्षक आमदार ज. मो अभ्यंकर यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट बोर्डच्या समारंभारत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर त्यांच्या नाड्या आवळल्या जातात, हे आपण वाचतो. आता कहर म्हणजे त्यांच्यातच आपापसात नाड्या लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आज तुम्ही पेपरमध्ये वाचले असेल, त्यात असे लिहिले आहे की बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेले होते.

    Maharashtra Timesठाण्यात रविंद्र, मंत्रालयात देवेंद्र; CMच्या एका खेळीनं शिंदेसेनेत खळबळ; तोच खेळ पुन्हा सुरु
    ही लाचारी का आणि कशासाठी?
    जर त्यांना त्या वयात योग्य शिक्षण मिळाले असते तर ही परिस्थिती आली नसती, असा टोला उद्धव यांनी लगावला. घरातून योग्य संस्कार व्हावे लागतात. संस्कारातून सर्व गोष्टी येत असतात. वडिलांनी घोटाळा केला की मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चिमटा काढला.

    Maharashtra Timesमहाशक्ती पाठिशी ते महाशक्ती लागली पाठी! शिंदेसेना अडचणीत; भाईंकडे आता एकच पर्याय
    बाप कोण आहे, तेच कळत नाही
    मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली.“गेले ३-४ वर्षे महापालिकेत बाप कोण आहे, तेच कळत नाही. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे आहेत. सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देत नाही’, असेही उद्धव ठाकरे उपहासात्मकपणे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहनही सर्व आमदारांना केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा