Maharashtra Politics: काँग्रेसच्या या आक्षेपानंतर महापालिका निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर होणाऱ्या मतदार यादीकडे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली. यानंतर प्रभागनिहाय लोकसंख्या मनपाने जाहीर केली आहे. आज, गुरुवारी मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र यापूर्वीच ही यादी आपल्या हाती लागल्याचा दावाही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काही प्रभागांमध्ये मतदारांची संख्या अधिक तर काहींमध्ये कमी करण्यात आली आहे.
‘अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्डवॉर सुरु’, सुषमा अंधारे यांचा धक्कादायक दावा
शेगाव-रहाटगाव प्रभागात २७ हजार ४५७ लोकसंख्या तर ३३ हजार ७६७ मतदार आहेत. संत गाडगेबाबा-पीडीएमसी प्रभागात २६ हजार ९५२ लोकसंख्या तर दुरुस्ती मतदार २५ हजार ४३८ आहेत. नवसारीमध्ये ३० हजार ७० लोकसंख्या असताना मतदार ३६ हजार ९२९ आहेत. सूतगिरणी-सामरा नगरमध्ये ३१ हजार १८४ लोकसंख्या असताना मतदार ४० हजार ११३ आहेत, असेही राठोड यांनी सांगितले.
कोट्यवधी मोजून आमचे नगरसेवक फोडले; भाजपच्या बड्या नेत्याची शिंदेंकडून तक्रार, शहांसमोर पाढाच वाचला
बावनकुळेंच्या दाव्यावर टीका
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या संपर्क दौऱ्यात अमरावती महापालिकेत भाजपचे ५० ते ५५ नगरसेवक निवडून येण्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्ता भाजपची राहणार असल्याचे ते म्हणत आहेत. लोकसंख्या कमी व मतदार वाढविले जात असल्याने भाजप नेते विजयाचे स्पष्ट संकेत देत असल्याचेही राठोड यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics : शाह साहेब, ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे ना… शिंदेंची नाराजी; दिल्लीत 50 मिनिटं चर्चा, भाजपश्रेष्ठी काय म्हणाले?
काँग्रेसच्या नाराज पिता-पुत्रासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
तर दुसरीकडे, निष्ठावानांना डावलून पैसा मोजणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करीत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेश मापारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राजेश मापारी, त्यांचे पुत्र युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गृहजिल्ह्यातील या राजीनामा अस्त्राने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

