Palghar Politics: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डहाणू तालुका अध्यक्ष असलेल्या चौधरी यांनी रविवारी शक्तिप्रदर्शन करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने या वादाला तोंड फुटले होते. डहाणू तालुक्यातील दिवशी ग्रामपंचायत अंतर्गत गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२०च्या रात्री करोनाकाळात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने क्रूरपणे हत्या केली होती. त्यानंतर शंभरहून अधिक आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. काशिनाथ चौधरी यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप भाजपने त्यावेळी केला होता.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राज्य सरकारचा मोठा निर्णय
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर चौधरी यांचा सायवन हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाला. अन्य गटातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी भाजपप्रवेश केल्याचे बोलले जाते. रविवारी चौधरी यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला. साधू हत्याकांडात पूर्वी भाजपने चौधरी यांच्यावर आरोप केले, मग आता पक्षप्रवेश कसा केला याबाबत त्यांनी जाब विचारला. या प्रकरणी मी योग्यवेळी प्रतिक्रिया देईन, असे चौधरी यांनी सांगितले.
Palghar News: शाळेत पोहोचायला दहा मिनिटं उशीर केला म्हणून अशी शिक्षा दिली की सहावीतली अंशिका जीवानिशी गेली, संतापजनक घटनेने महाराष्ट्र हादरला
आरोपी म्हणून उल्लेख नाही
मुंबई : पालघर जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘चौधरी यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणी साक्षीसाठी बोलावले होते. चौधरी यांचा सीबीआय अथवा सीआयडी यांनी केलेल्या तपासात कोठेही आरोपी म्हणून उल्लेख नाही. प्राथमिक माहिती अहवालात किंवा आरोपपत्रामध्ये चौधरी यांचे नाव नाही. या सर्व माहितीची खातरजमा करून स्थानिक पातळीवर चौधरी यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला’ असे ते म्हणाले. ‘चौधरी हे कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते. तेथे असताना रोहित पवार यांना चौधरी हे चांगले वाटत होते. पक्ष सोडल्यावर रोहित पवार यांना ते एका रात्रीत ते दोषी कसे वाटू लागले’, असा प्रश्न बन यांनी उपस्थित केला.

