Nashik Crime News : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. केवळ 3 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत आरोपीला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्याचार करून निर्घृण खून केलेल्या चिमुरडीचा मृतदेह हा मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून विजय खैरनार नामक संशयित आरोपीला अटक केली आहे.
जळगावच्या राजकारणात महायुतीत महायुद्ध, ‘मंगेश चव्हाण किस गली में गलबला’, किशोर पाटील यांची बोचरी टीका
आज सोमवारी रोजी सकाळी मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर केस ही फास्टट्रॅक कोर्टात नेऊन, सरकारी वकील उज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमलं जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं.
Sangli Crime : मुलीच्या वडिलांचा लग्नास नकार, एकतर्फी प्रेमात तरुणाने नको ते केलं, लेकीच्या साखरपुड्यात बापावर हल्ला; मुलीचं बोट तोडलं
दरम्यान, ‘आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत ज्या काही कायदेशीर बाबी करता येतील त्या आम्ही लवकरात लवकर करु. सदर घटना ही रेप विथ मर्डरची घटना झाली असून याबाबत गुन्हा देखील दाखल झाला आहे. तर याचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकारी कडून करण्यात येत आहे. गंभीर घटनेचा विचार करता पुरावे जमा करण्यास अडचण निर्माण होणार नाही असं काम आम्ही करीत असून, ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. लोकांच्या भावना तीव्र आहेत, आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत ज्या काही कायदेशीर बाबी करता येतील त्या पूर्ण आम्ही लवकरात लवकर करु’, असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

