• Thu. Mar 12th, 2026

    Devendra fadanvis: स्थानिक निवडणुकांतही विरोधकांचा सुपडा साफ होणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, ‘भाजप मोठा पक्ष…’

    Devendra fadanvis: स्थानिक निवडणुकांतही विरोधकांचा सुपडा साफ होणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, ‘भाजप मोठा पक्ष…’

    Cm devendra fadnavis: छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर टीका करत दमदार इशाराच दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा आहे. यावेळी त्यांनी विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

    यावेळी भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, “बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या सुधनावर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपाडा साफ केला. याबद्दल बिहार जनतेचे आभार मानतो. आपला विजयाचा रथ सातत्याने पुढे जात आहें. मोदींवर सर्वांचा विश्वास आहे. विरोधकांचा फेक नेरेटीव आपण हाणून पडला आहे. विरोधकांना जनतेत गेल्यावर कळेल नेमकं काय झालं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांची पुन्हा हीच परिस्थिती होणार आहे,” असा इशारा फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.

    Maharashtra TimesSolapur News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड, भाजपची खेळी; 20 हजार शिवसैनिक फोडले, 55 शाखाप्रमुखांचे राजीनामे

    भाजपाच्या वाटचालीत प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी सातत्याने आपली कार्यालये झाली पाहिजे पक्षाला स्थैर्य अल पाहिले यासाठी खूप प्रयत्न केले. त्याकाळी मिळेल ते कार्यालय घेतले आहे. २०१४ साली सरकार आले. देशात अमित शहा यांनी सांगीतले प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय झालं पाहजे. तेव्हापासून प्रत्येक जिल्ह्यात जागा घेऊन परवानगी घेणे, हे काम सुरू आहे. कुठेही सरकारी किंवा अनधिकृत कार्यालय घ्यायचं नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील हे विभागीय कार्यालय आहे. विमानतळाच्या जवळ जागा असल्याने ही जागा निश्चित केली आहे. या कार्यालयातून जनतेच्या किती समस्या सोडवतो, हे महत्त्वाचं असतं, आपण जनसामान्यांच्या समस्या सोडवणार आहोत.

    मराठवाड्यात सरकारने अनेक चांगली कामे केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याच्या पाण्याची योजना आपण मंजूर केली आहे. इथे राष्ट्रवादी, उबठा यांना लाजही वाटत नाही. आपण मंजूर केले योजना ८०० कोटीचा कर राज्य सरकार भरणार असा निर्णय केला आहे. आंदोलन करणाऱ्यांचा सरकार आल्यानंतर ८०० कोटी रुपये महापालिकेने भरावे असा निर्णय केला, यामुळे काम थांबलं. आता आपल सरकार आल्यानंतर पैसे दिले आहेत. यामुळे प्रत्येक घरात रोज पाणी मिळणार आहे. आंदोलन करणाऱ्यांसारखे खोटारडे लोक नाहीत. यांना महापालिका निवडणुकीत जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आले आहेत. यातून मोठा रोजगार मिळाला आहे. देशाचा इलेक्ट्रिक वाहन कॅपिटल छत्रपती संभाजीनगर होत आहे, असही यावेळी फडणवीस म्हणाले.

    समृद्धी महामार्गामुळे शहराला फायदा झाला, मराठवाड्यातील सिंचन, नदीजोड प्रकल्प सरकारने केले आहेत. शेतकऱ्यांवर संकट आल्यावर राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले तेव्हा अंबादास दानवे माणसं शोधत होते. लोकांना माहिती आहे यांच्याकडं काही नाही. आपल्याला प्रत्येक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजप मोठा पक्ष ठरणार आहे, असं मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा