Ramesh Chennithala Congress: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारी काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर झाले. या शिबिरानंतर चेन्नितला यांनी पत्रकारांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच बिहार निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले.
मुंबईत काँग्रेसच्या कट्टर समर्थकांची मते कुठेही जाणार नाहीत. मात्र, मनसेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर दलित, उत्तर भारतीय, मुस्लिम मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, असे सांगत चेन्नितला यांनी स्वबळाचा निर्णय जाहीर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे बिहारचा विजय हा निवडणूक आयोगाचा आहे’, असा आरोप चेन्नितला यांनी केला. याबद्दल जनजागृती करणार असल्याचेही ते म्हणाले.
Bihar Election 2025 Result: राज्यसभेतही ‘लालटेन’ अंधकारमय; पाच वर्षांनी वरिष्ठ सभागृहात एकही सदस्य नसण्याची शक्यता
नकारात्मकता सोडून द्या
संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. निवडणुकीत विजय-पराभव होतच असतो. पण, सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून द्या, व लढाऊ बाणा अंगी बाळगा’, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला. बिहार विधानसभेचे निकाल उलटे लागले असते तर आजचा उत्साह अधिक वाढला असता. पण, पराभव झाला म्हणून खचून जाऊ नका. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागले पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
Bihar Election Result 2025: डाव्या आघाडीच्या मतांमध्ये घट; NDAमधील छोट्या घटक पक्षांकडे जागा वर्ग
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ?
बारामती : कोल्हापूरच्या चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे. ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आम्ही पक्ष म्हणून पाहत नाही. तालुकास्तरावरील स्थानिक नेतृत्वाने एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घ्यावा, असे ठरले आहे,’ असे सांगत शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीचा चेंडू शनिवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कोर्टात टोलवला.
अनेक पराभव पचवून काँग्रेस पक्ष नव्या ताकदीने उभा राहिला, हा इतिहास आहे. त्यामुळे पराभवामुळे काँग्रेस संपेल, काँग्रेसचे तुकडे होतील, हे दावे निराधार आहेत. काँग्रेस पक्ष कधीच संपणार नाही, नव्या जोमाने उभा राहील. – रमेश चेन्नितला, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी

