• Sat. Mar 7th, 2026
    काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे, आमचाच महापौर होणार : बाळासाहेब थोरात

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, आम्ही राज्यघटनेची विचारधारा मानतो. काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे. मोदी जे बोलले आहेत त्यावरून ते राज्यघटना मानत नाहीत असं वाटतं. देवेंद्र फडणवीस बोलले तसं काही होणार नाही. त्यापूर्वी ते म्हणाले होते, मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन पण ते आले का? तर नाही. देवेंद्र यांचा आत्मविश्वास संपला आहे. म्हणून ते अशा प्रकारची विधानं करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed