Pune Navale Bridge: मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगद्यापासून ते चांदणी चौकापर्यंत गेल्या पाच वर्षांत २५७ अपघात झाले असून, त्यात १०३ जणांचा मृत्यू झाला.
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील कात्रज बोगदा ते नवले पूल हा भाग अपघात क्षेत्र बनला होता. त्यामुळे सन २०२२मध्ये पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे पोलिस यांनी एकत्रित उपाययोजना करण्याबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर तातडीच्या काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली, तर दीर्घकालीन उपाययोजनांवर काम सुरू केले होते. त्यामुळे सन २०२२नंतर या भागात अपघातांची संख्या काहीशी कमी झाली.
Pune Crime : ठाण्यात ओळख, पतीच्या निधनानंतर दीपकसोबत अनैतिक प्रेमसंबंध, घरी राहायला गेली, एक दिवस… पुण्यात खळबळ
वाहतूक पोलिसांनी जड, अवजड वाहनांना प्रतितास ४० किलोमीटर अशी वेगमर्यादा निश्चित केली होती; तसेच विविध ठिकाणी रम्बलर स्ट्रीप व रिफ्लेक्टर बसविले होते. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. महामार्गावरील सूचनाफलक दर्शनी भागावर लावले होते. त्यामुळे नवले पूल परिसरात सन २०२४मध्ये एकूण आठ अपघात झाले. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी होता; पण दीर्घकालीन व तात्पुरत्या उपाययोजनांचे पुढे काटेकोर पालन न झाल्यामुळे यंदा अपघातांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
अपघात रोखण्यासाठी सूचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष
मुख्य उतार कमी करणे, दरीपूल ते स्वामीनारायण मंदिरादरम्यानचे तीव्र वळण कमी करणे.
विविध ठिकाणी रम्बलर स्ट्रीप व रिफ्लेक्टर बसविणे.
जड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ४० किमी करणे.
दर ३०० ते ४०० मीटरच्या अंतरावर रम्बलर स्ट्रीप बसविणे.
महामार्गावरील सूचनाफलक दर्शनी भागावर लावणे.
Pune Navale Bridge : नवस पूर्ण करुन निघाले, एकाच कुटुंबातील तिघांसह चिमुकलीचाही मृत्यू, बाबा म्हणाले माझी मोक्षिता गेली आणि…
‘उन्नत मार्ग, हाच कायमस्वरूपी उपाय’
‘नवले पूल परिसरातील अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी काही अल्पकालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, जांभूळवाडी (नऱ्हे) ते सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत हा ३२ किलोमीटरचा उन्नत मार्गच यावरील कायमस्वरूपी उपाय आहे. या उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) मान्य झाला असून, त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’ अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली. मोहोळ यांनी नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
पाच वर्षांत १०३ जणांचा मृत्यू
सन २०२२मध्ये या मार्गावर सर्वाधिक ७४ अपघात झाले होते. त्यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सन २०२३मध्ये अपघाताची संख्या कमी झाली. या वर्षी ५७ अपघात झाले; पण मृत्यूंची संख्या (३१) वाढल्याचे दिसून आले. सन २०२४मध्ये अपघात व मृत्यू दोन्ही कमी झाल्याचे दिसून आले. सन २०२४मध्ये एकूण अपघात ४९ झाले होते. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला, तर २०२५मध्ये आत्तापर्यंत २८ अपघात झाले असून, त्यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

