• Sat. Mar 7th, 2026
    महायुतीव्यतिरिक्त अन्य पक्षांशी युती करु नका; रामदास आठवलेंची पदाधिकाऱ्यांना सूचना

    Ramdas Athawale: मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आठवले यांनी हे आदेश दिले.

    athawale(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांशिवाय इतर पक्षांशी युती करू नका, असे स्पष्ट आदेश केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत असतील तिथे रिपब्लिकन पक्षाने युतीसाठी भाजपला प्राधान्य द्यावे, जिथे भाजपकडून समाधानकारक जागा मिळत नसतील तिथे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आदी यावेळी उपस्थित होते.
    Maharashtra Times‘2010 मधील रेकॉर्ड तुटेल, काँग्रेसला जनतेकडून उत्तर’; बिहार निवडणूक निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
    स्थानिक निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे अनेक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे आपल्याला अधिकाधिक जागा कशा मिळतील, यावर भर देताना पाहायला मिळत आहे.

    दरम्यान, ‘आगामी निवडणुकासाठी आम्ही भाजपासोबत आहोत. मात्र आम्हाला मनासारख्या जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत’, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
    Maharashtra TimesMumbai Crime : दिल्लीत ‘लाल’ कारमध्ये स्फोट, आता मुंबईतील CSMT जवळ ‘लाल’ बॅग आढळली; उघडली असता काय सापडलं?
    NCP चा भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य पक्षांची युती
    सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला आव्हान देण्यासाठी समान विचारधारेच्या पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे, महायुतीसोबत जाऊन निवडणूक लढवणे प्रभावी ठरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोबत मिळून नगराध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदांसाठी एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा