• Wed. Mar 18th, 2026

    Pune News: पुण्यात वारंवार होणाऱ्या अपघांतामुळे नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप, महामार्गावर प्रशासनाविरोधात तिरडी आंदोलन

    Pune News: पुण्यात वारंवार होणाऱ्या अपघांतामुळे नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप, महामार्गावर प्रशासनाविरोधात तिरडी आंदोलन

    Pune agitation: पुण्यातील नऱ्हे परिसरात वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांनी संतप्त होत सातारा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. प्रशासनाच्या निषेधार्थ अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतीकात्मक आयोजन करत, त्यांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज नऱ्हे परिसरात वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेमुळे सातारा – मुंबई राष्ट्रीय मार्ग रोखून आंदोलन केले आहे. यावेळी प्रशासनाची तिरडी बांधून रस्त्यावर मांडून निषेध नोंदवला आहे. अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतीकात्मक आयोजन करून नागरिकांनी शासनाला जाग होण्याची साद घातली आहे.

    अलीकडच्या अपघातात लहान मुलीसह कुटुंबाची झालेली होरपळ पाहून . “या भागात मृत्यूंची मालिका सुरू आहे. प्रशासन काहीच करत नाही. असेच चालू राहिले तर लोकांना जगण्यापेक्षा आत्महत्या करावीशी वाटेल,” अशी वेदनादायी भावना भूपेंद्र मोरे यांनी व्यक्त केली आहे. जय हरी वडगाव आणि आसपासचे नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत.

    Maharashtra TimesChhatrapati sambhaji nagar: गाझातल्या युद्धग्रस्तांना मदत पाठवण्याच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? लाखो रुपये ट्रान्सफर, एटीएसने एकाला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडतंय?

    या आंदोलनात भुपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जवळपास दोन तास सातारा–मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली होती. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना कराव्यात, रस्त्यांची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.

    यावेळी मोरे म्हणाले, “शासनाचे अधिकारी पाहणी करून जातात, आश्वासने देतात, पण बदल काहीच होत नाही. आमचे जीव गेले तरी प्रशासन जागे होत नाही. तुम्ही केलेल्या मदतीने ते जीव पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडून नयेत यासाठी आपण उपाययोजना करणे गरजेचे आहे”

    दरम्यान, नऱ्हे परिसरातल्या नवले पुलावर काल रात्रीच्या सुमारासही भीषण अपघात झाला आहे. दोन कंटेनरमध्ये एक कार चेपली होती, यावेळी मोठा आवाज झाला, आग लागली व अनेक वाहने यात जळाली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू व २५ जण जखमी झाले आहेत.

    या आंदोलनात श्री राजाभाऊ जाधव, विठ्ठल सूर्यवंशी , हरीश वैद्य, लतिफ शेख, प्रशिक दारुंडे, सुनील पढेर, महेश गाडगे, सुशील भागवत, आनंद थेऊरकर, सुदर्शन देशमाने, सोनाली नायर यांसह अनेक नागरिक उपस्थित होते. नऱ्हे परिसरातील लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील काळात आणखी मोठे आंदोलन उभे राहील, असा इशाराही भूपेंद्र मोरे यांनी यावेळी दिला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा