Harshwardhan Sapkal: पुण्याचे रिंगरोड, समृद्धी महामार्ग या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यात आला. म्हणजे चोरी केल्याची कबुली देत आहेत. ‘एफआयआर’मध्ये पार्थ पवार यांचे नाव का नाही, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने या आधी पुण्याच्या बोपोडीतील ॲग्रिकल्चर डेअरीची सरकारी जमीन बोगस कागदपत्रांद्वारे हडप केली. हे पैसे कोणी दिले, कसे दिले, या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळाली पाहिजेत. चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.
Mumbai News: सावरकर पुलाचे पाडकाम रद्द; सागरी किनारा मार्गासाठी ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञानाद्वारे होणार नव्या पुलाची उभारणी
भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती. तो प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला, हे जाहीर करण्यात आले, पण हे प्रकरण संपलेले नाही. या प्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यावर काय कारवाई झाली? मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. भाजपच्या मुंबईतील कार्यालयासाठी सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला नवा शेठ मोहीत कंभोज यांना एसआरएच्या जमिनी दिल्या आहेत.
मतदारयादीत काँग्रेस आमदाराचे दोनदा नाव; भाजप नेत्याने राहुल गांधींकडून मागितला खुलासा
..हे तर पुतना मावशीचे प्रेम
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वंदे मातरम् ला नेहमीच विरोध केला आहे. संघाच्या शाखेत हे गीत कधीच गायले नाही. भाजपने आता इतक्या वर्षांनंतर ते स्वीकारले, याचा आम्हाला आनंदच आहे. पण आता भाजप या गीताचा वापर राजकीय हेतूने करत आहे. हे पवित्र गीत धार्मिक किंवा जातीय दंगली घडवण्यासाठी, तसेच सामाजिक शांतता भंग करण्यासाठी नाही. ‘वंदे मातरम्’ गीतावरचे भाजपचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

