• Fri. Mar 6th, 2026
    घरी परतण्यासाठी लोकल पकडताना घसरले अन्.., वाशी स्थानकावर प्रवाशाचा दुर्दैवी अंत

    वाशी रेल्वे स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली. प्रवासी लोकल पकडत असताना घसरले अन त्यांचा अपघात झाला. यात त्यांचा अंत झाला. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : शुक्रवारी वाशी रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना जयेश मळेकर (वय ४१ वर्षे) यांचा अकाली मृत्यू झाला. जयेश मळेकर हे मुंबई सेंट्रल येथील रहिवासी होते. त्यांनी नवी मुंबईमध्ये कामानिमित्त सकाळी निघाल्यानंतर घरी परतताना वाशी स्थानक क्रमांक ४ वर मुंबईच्या दिशेने येणारी पनवेल-CSMT लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. ट्रेन पकडताना त्यांनी संतुलन गमावले आणि अचानक रुळावर घसरले.

    स्थानकावरील काही नागरिकांनी तातडीने त्याला रेल्वे रुळावरून बाहेर काढले आणि वाशी मनपा रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र गंभीर जखमी अवस्थेमुळे त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने मळेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीचा अचानक गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

    पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, जयेश धावत्या लोकल पकडण्याच्या प्रयत्नात घसरले आणि या दुर्दैवी घटनेचे कारण झाले. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारावर अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. यावेळी स्थानकावरील प्रवाशांची गर्दी, धावत्या लोकलमुळे प्रवाशांमध्ये घसरणे किंवा संतुलन गमावणे यामुळे अपघात होऊ शकतो, असा निष्कर्ष पोलीस देत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच स्थानकांवर सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले आहेत.

    या घटनेतून प्रवाशांसाठी जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे. लोकल पकडताना सावधगिरी बाळगणे, प्लेटफॉर्मच्या सुरक्षित ठिकाणी उभे राहणे आणि धावत्या ट्रेनोंपासून अंतर राखणे आवश्यक आहे, असे स्थानिकांनी सांगितले. जयेश मळेकर यांचे अकाली निधन केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, संपूर्ण नवी मुंबईसाठी धक्कादायक ठरले आहे. या दुर्दैवी घटनेने स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवांशाना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. स्थानकावर दिल्या जाणाऱ्या सूचना दुर्लक्षित केल्या जातात. काहीवेळा प्रवाशांकडून केली जाणारी घाई ही धोक्याची ठरते.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा