Nashik Vanchit Bahujan Aghadi Resigns 200 Members : नाशिकमध्ये मोठी घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठा फटका बसला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, यातच सर्व पक्ष आता आपापल्या रणनीती आखून तयारीला लागल्या आहेत. यातच जिल्हाभरात अनेक राजकीय पक्ष प्रवेश होत आहेत. एकीकडे असं चित्र असताना आता दुसरीकडे नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. 200 कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षाची साथ सोडली आहे. आगामी काळातील त्यांची पुढची काय भूमिका असेल हे जरी त्यांनी आता स्पष्ट केलं नसलं तरी येत्या काळात आपण आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Mumbai Local Accident : मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, काही प्रवासी जखमी
निवडणुकीआधीच नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडी अडचणीत आले असल्याचं चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तब्बल 200 निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्यानं पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजात गटबाजी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि विशेषत: जिल्हा अध्यक्षांच्या वागणुकीबद्दल नाराजी वाढत चालली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून पदाधिकाऱ्यांनी अखेर एकत्रितपणे राजीनाम्यांचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आम्ही लवकरच पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या राजीनाम्यांमुळे वंचित बहुजन आघाडीचं संघटन ढासळलं आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील याचा मोठा फटका हा वंचित बहुजन आघाडीला बसणार आहे.
Mumbai Local : रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुंबईची लोकल थांबवली, मध्य रेल्वेची वाहतूक 50 मिनिटं थांबली, अखेर…
जिथे NCPचा जोर, तिथेच दादांच्या जीवाला घोर
नाशकात विधानसभेचे १५ मतदारसंघ आहेत. पैकी ७ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे, तर ५ मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. नाशिक शहराबाहेर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. ते मोडून काढण्याची तयारी भाजपनं सुरु केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघांतील ताकदवान नेते भाजपनं गळाला लावले आहेत.

