Nagpur News: तलावात पोहण्याच्या नादात मामा- भाचीला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अविनाश आनंद (वय २०, मूळ रा. बिहार), संकल्प सुनील माळवे (वय १९, मूळ रा. चंद्रपूर), हर्षिता विनोद माकडे (वय १३, रा. शिवाजी वॉर्ड, रामटेक) व तिचे मामा अजय वामनराव लोहबरे (वय ३२, रा. खात) अशी मृतकांची नावे आहेत. अविनाश हा प्रियदर्शिनी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला, संकल्प सेंट पॉल स्कूलमध्ये बारावीत तर हर्षिता ही रामटेक मधील आदर्श शाळेत नववीत शिकत होती.
निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये साटेलोटे आहे का?, शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप
टिपूर पौर्णिमेसाठी आला होता अजय
रामटेक तालुक्यातील डोंगरी येथील जयपालेश्वर तलावात घडली. अजय हे टिपूर पौर्णिमेनिमित्त रामटेक येथे आला. मंगळवारी त्याने शोभायात्रा बघितली. हर्षिताही पोहणे शिकत असल्याने नेहमीप्रमाणे ती बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वडिलांसह तलावाकडे जायला निघाली. यावेळी अजयही त्यांच्यासोबत गेला. अजय व हर्षिता पोहायला लागले. हर्षिताने पोहण्यासाठी ट्यूबची मदत घेतली. पोहताना ट्यूब शरीरातून बाहेर निघाला. ती बुडायला लागली. हर्षिताने मदतीसाठी आरडाओरड केली. अजय तिला वाचविण्यासाठी गेला. हर्षिताने अजयला घट्ट पकडले. बघता-बघता अजय व हर्षिता दोघेही तलावात बुडाले. विनोद यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. ग्रामस्थ जमले.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणीनंतर शोकाकुल वातावरणात दोघांच्या पार्थिवावर अंबाळा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही प्रकरणी पारशिवनी व रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
‘आयोग दबावाखाली, मतदार याद्यांमधील घोळाकडे दुर्लक्ष’; मविआचे नते कायदे अभ्यासकांशी चर्चा करणार, अनिल देशमुख म्हणाले…
दुसरी घटना: पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अविनाश, संकल्प, अवदेत मारोती गौरकर (वय १७, मूळ रा. अहेरी, जि. गडचिरोली), ओजस प्रकाश कठोके (वय १६, रा. म्हाळगीनगर), सम्यक अनिल उंदिरवाडे (वय १७, रा. भिलगाव), ओम मनोहर चौरे (वय १७, रा. वडधामनेरी, जि. वर्धा), प्रेम कमलाकर कोरडे (वय २०, रा. वाघोडा, चंद्रपूर) व यथांगसागर चौरे (वय १७, मूळ रा. चंद्रपूर) हे शिक्षणासाठी नागपुरात आले. सर्वजण विविध वसतिगृहांत व भाड्याने राहतात. ते एकमेकांचे मित्र आहेत. पारशिवनी तालुक्यात भागीमहारी तलाव निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथे अनेक जण पिकनिकसाठी येतात.
बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हे आठही जण भागीमहारी तलाव येथे पिकनिकसाठी आले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सर्वजण मोबाइलने सेल्फी काढण्यासाठी तलावात उतरले. अविनाश व संकल्पही सेल्फी काढायला लागले. पाय घसरल्याने दोघेही तलावात बुडाले. अन्य मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक तेथे पोहोचले.
घटनेबाबत कळताच पारशिवनी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश थोरात, उपनिरीक्षक रामराव पवार, हेडकॉन्स्टेबल धुर्वे, पृथ्वीराज चव्हाण आदींसह पोलिसांचा ताफाही तेथे आला. पोलिसांनी स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने अविनाश व संकल्पला शोधण्यास सुरुवात केली. सुमारे एक ते दीड तासानंतर संकल्पचा मृतदेह आढळून आला. वृत्त लिहिपर्यंत अविनाशचा शोध सुरू होता.

