• Sat. Mar 7th, 2026
    सुजय विखेंवर खासदार निलेश लंकेंचा पलटवार; मनमाड महामार्गावरुन दिलं जोरदार प्रत्युत्तर, रस्ता कधी पूर्ण होणार? हेही सांगितलं

    Nilesh Lanke Reply Sujay Vikhe Patil: अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील आणि विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यात श्रेयवादावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करताना काय म्हटलं आहे, पाहूयात.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: मागील अनेक वर्षांपासून दुष्टचक्रात अडकलेल्या अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या कामावरून आता राजकारण तापले आहे. या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणाच्या काळात पूर्ण होणार यावरून आजी-माजी खासदारांत जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. रस्त्यांच्या श्रेयवादाची लढाई याठिकाणी पाहायला मिळते आहे.

    अहिल्यानगरच्या एका कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंके यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. ते म्हणाले की “अहिल्यानगरच्या एका कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंके यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. ते म्हणाले की “मागच्या एका वर्षामध्ये मी केलेल्या कामाच्या दोन टक्केही काम सध्याचे लोकप्रतिनिधी करु शकले नाहीत. माझ्या उपोषणानंतर नगर – पाथर्डी महामार्गाचं काम पूर्ण झालं आहे, असं म्हणतात ना तर मग तुमच्या उपोषणामुळे नगर- मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता”, असं सुजय विखे म्हणाले आहेत.

    Maharashtra TimesRaigad News: ‘सुनील तटकरे हे कुत्र्याचे शेपूट, वाकडेच राहणार’; शिंदे सेनेच्या आमदाराने सगळंच काढलं, महायुतीतला वाद चव्हाट्यावर

    प्रत्युत्तरात खासदार लंके म्हणाले..

    यावर प्रत्युत्तर देताना खासदार निलेश लंके म्हणाले, “तुम्ही या विभागाचे सहा वर्ष खासदार होता. मी फक्त एक वर्ष झालोय आणि माझ्या पाठपुराव्यानंतरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी ठेकेदार बदलले. आता या महामार्गाचं काम सुरू आहे आणि हे काम माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल.”

    शिर्डी — शनिशिंगणापूर भाविक नगर मनमाड महामार्गामुळे झाले त्रस्त

    दरम्यान, अहिल्यानगर–मनमाड महामार्ग हा शिर्डी आणि शनिशिंगणापूर या जागतिक दर्जाच्या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, सध्या या मार्गावरील राहुरी ते अहिल्यानगर हा टप्पा खड्डेमय आणि धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जणू कसोटीच बनली असून नागरिक आणि भाविक त्रस्त झाले आहेत.

    राजकारण्यांच्या आरोप–प्रत्यारोपात रस्ता मात्र अजूनही अर्धवट

    याशिवाय राजकारण्यांच्या आरोप–प्रत्यारोपात रस्ता मात्र अजूनही अर्धवट आहे. जनतेचे हाल मात्र सुरूच आहेत. या रस्त्यासाठी विविध राजकीय पक्ष संघटनांनी मोर्चे,आंदोलन केले, निवेदन दिले अनेक निष्पाप नागरिकांचे या रस्त्याने जीव घेतले आहेत. तरीदेखील अद्याप या रस्त्याचे काम अर्धवटच राहिले असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा