Raigad News : रायगडचा प्रसिद्ध मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामानातील बदलामुळे बोटी बंद होत्या. यामुळे पर्यटकांना किल्ला पाहता आला नव्हता.
दिवाळी सुट्टी आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक मुरुडमध्ये दाखल झाले होते. मात्र, समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि हवामान खात्याने इशारा दिल्यामुळे बंदर विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, लाखो पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्याची संधी गमवावी लागली आणि पर्यटन व्यवसायावर तात्पुरता परिणाम झाला.
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी मोठी फील्डिंग, राजकीय समीकरण बदलली
पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी सांगितले की, “सोमवारी हवामान अनुकूल झाल्याने बोटी पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. पर्यटक आता सुरक्षितपणे जंजिरा किल्ला पाहू शकतात.” या नऊ दिवसांच्या कालावधीत हॉटेल, होम-स्टे, फेरी सेवा आणि स्थानिक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. आता किल्ला खुला झाल्याने पर्यटन उद्योगाला पुन्हा चालना मिळणार आहे.
Raigad News : कोकणात दोन गावांना जोडणारा पूल कोसळला; मधोमध दोन भाग, वाहतूक ठप्प, ग्रामस्थांचे हाल
दरम्यान, स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांनी किल्ल्याच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या नवीन जेट्टीचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात हवामानामुळे होणारा अडथळा कमी होईल. मुरुड-जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राच्या सागरी इतिहासाचा अभिमान असून, या किल्ल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. हवामान पुन्हा स्थिर झाल्याने मुरुड-जंजिरा परिसरातील पर्यटनाला पुन्हा नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

