• Sat. Mar 7th, 2026
    Solapur News : ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा, निवडणुकी अगोदर वाद असतातच, मी शांत केलं… चंद्रकांत खैरेंची स्पष्टोक्ती

    Solapur Shiv Sena : सोलापूरमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या बैठकीत राडा झाल्याची माहिती आहे. मात्र खैरे यांनी निवडणुकीआधी वाद होत असतात असं म्हणत यावर भाष्य केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. उद्धव सेनेचे अनिल कोकीळ आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. दुपारी व्यंकटेश्वर मंदिरात देखील शिवसेनेची बैठक संपन्न झाली. या झालेल्या बैठकीत मोठा राडा झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काही राडा किंवा गोंधळ झाला नाही, फक्त प्रश्नोत्तरे झाली अशी माहिती दिली आहे.

    खैरे म्हणाले काही झालं नाही; निवडणूकी अगोदर किरकोळ वाद असतात

    ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी हुज्जत घातली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बैठकीतील गोंधळ शांत न झाल्याने खैरेंनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दम दिला. शासकीय विश्रामगृह येथे बैठकीस आलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं, की किरकोळ वाद होता. मी सगळ्यांना शांत केलं, निवडणुकी अगोदर काही वाद असतातच. नंतर सगळे येऊन माझ्या पाया पडले.
    Maharashtra Timesएकनाथ खडसेंच्या बंगल्यात मध्यरात्री चोरटे घुसले; कॅश आणि सोन्याचे दागिनेही लंपास, किती मुद्देमाल पळवला?

    व्यंकटेश्वरा मंदिरात गोंधळ झाला

    उद्धव सेनेच्या बैठकीतील गोंधळ वाढताच काहींनी बैठक सोडली. उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, तसंच सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली. सुरुवातीला उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महिला आघाडी प्रमुख अमिता जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर पुरुष पदाधिकाऱ्यांमध्येही जोरदार वादाला सुरुवात झाली.

    निंबाळकरांवर फडणवीसांचा आशीर्वाद, आमच्याकडे सत्याला सामोरं जाण्याची खंबीरता, अंधारेंनी ललकारलं!

    बरडे समर्थकांनी ‘दासरी हटाव’चा नारा दिला. लहू गायकवाड, सुरेश जगताप आणि दत्ता कलाटी यांनी दासरींवर टीका केली. तर, शशिकांत बिराजदार आणि रविंद्र नागेणकेरी यांनी पक्षातील गद्दारांवर कारवाईची मागणी केली. त्यांचा रोख बरडे यांच्याकडे होता. त्यामुळे बरडे समर्थक संतापले. दुसरीकडे अस्मिता गायकवाड यांचा नावाचा उल्लेख एकेरी केल्याने त्यांच्या समर्थकांनी अजय दासरींना धारेवर धरले. यावेळी बराच वेळ गोंधळ सुरू होता.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा