• Sat. Jun 6th, 2026

    ‘मुंबई गिळायला ॲनाकोंडा मुंबईत आला होता’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर हल्लाबोल, म्हणाले, ‘नाही तुझं पोट फाडून…’

    ‘मुंबई गिळायला ॲनाकोंडा मुंबईत आला होता’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर हल्लाबोल, म्हणाले, ‘नाही तुझं पोट फाडून…’

    uddhav thackeray on amit shah: उद्धव ठाकरेंनी आज अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी अमित शाहांना अॅनाकोंडा म्हणत मोदी शाहांवर जोरदार टीकास्र डागलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबईमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोमध्ये हा मेळावा पार पडत आहे. आज अमित शाहाही मुंबईमध्ये आहेत. त्यांनी आज मुंबईतील माझगाव डॉक येथे अत्याधुनिक नौकांच लोकार्पण केलं आहे. याच मुद्याला धरून उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे. त्यांनी अमित शाहांना अॅनाकोंडा म्हटलं आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात.

    “मुंबईवरती कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. खासकरुन दोन व्यापाऱ्यांचा, आजचं एकजण येऊन गेला, आज काय योगायोग आहे माहित नाही. सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या, एक पहिल्या पानावर आहे, ती म्हणजे भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि दुसरी आतमध्ये आहे. जिजामाता उद्यानात लवकरचं अॅनाकोंडा येणार, आता आपण पेंग्विन आणले म्हणून लाखो पर्यटक वाढले, याचा मला अभिमान आहे.

    Maharashtra TimesSolapur News: द्राक्षबाग उद्ध्वस्त झालेल्या ‘त्या’ शेतकरी महिलेला आमदारपुत्राची भेट, शेतकरी महिलेचा पुन्हा टाहो
    त्यावरून काही पेंग्विनच्या उंचीची आणि बुद्धीची माणसं आपल्यावर टीका करतात ते सोडून द्या. पण, अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप. त्यांना मुंबई गिळायची आहे. बरं कशी गिळतोस तेच बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

    पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भूमिपूजनाला आलास ना फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाहीतर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करतानासुद्धा घराणेशाहीवरती टीका. म्हणजे याचं कारटं क्रिकेट बोर्डावर मेरीटने झालंय, बरं घराणेशाही कोणाची ठाकरेंची? अरे उभा राहून दाखव समोर, म्हणून मला त्या अफदालीला सांगायचंय, की आम्ही आमच्या आईवडिलांचे ऋण माननारे पाईक आहोत. वारसदार आहोत. संजय राऊत म्हणाले तसं ब्रम्हचाऱ्यांची पिलावळ नाही, तुम्हा ब्रम्हचाऱ्यांना 40 पोरं झाली कशी? मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो, तिचं परिस्थिती भाजपची झाली आहे. गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं”, अशी घणाघाणी टीका उद्धव ठाकरेंनी भाजप व मोदी- शाहांवर केली आहे.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    मुंबईमध्ये फक्त भगवाचं फडकवून दाखवणार असं सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, या मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा