Jalna News : रब्बी पिकांची मशागत करताना महिलेचा शेतातच दुर्दैवी मृत्यू झाला. झाडाखाली पाणी पीत असताना महिला खाली कोसळली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2025 रोजी, रविवार दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदे तांगडा येथे अल्पभूधारक शेतकरी नारायण बोडखे यांची सर्व मुलं, नातवंडं आणि ते स्वतः शेतात रब्बी पिकांची मशागत करण्यासाठी शेतीकाम करत होते. त्यांचं शेत गावाजवळच आहे.
Beed News : बीडमधील कुटुंबासोबत रस्त्यात अनर्थ घडला; अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत भयंकर घडलं, आई-वडिलांचा टाहो
लिंबाच्या झाडाखाली बसल्या आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला
यावेळी त्यांचा दोन नंबरचा मुलगा गणेश बोडखे, याची पत्नी मनिषा बोडखे, वय 30 वर्ष, हे आपल्या संपूर्ण परिवारासह शेतात शेत मशागतीची कामं करून घरी पाणी पिण्यासाठी गेली. यावेळी ती घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून माठातून पाणी पिऊ लागले. त्याच वेळी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. एक घोट तोंडात, तर एक घोट ग्लासमध्ये ठेवून या महिलेचा जागीच जीव गेला. यानंतर तिच्या घरच्यांनी तात्काळ तिला गावातील रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं.
कर्जाचा सतत वाढता डोंगर, ऑनलाईन गेमिंगने आयुष्य उद्धवस्त; तरुणाचा टोकाचा निर्णय, 3 वर्षाच्या पितृछत्र हरपलं
आपली सून, मुलांची आई हसत-खेळत असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि आपल्यातून निघून गेली. हे कळताच संपूर्ण कुटुंबाने एकच टाहो फोडला. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मनिषा बोडखे नुकत्याच आपल्या भावाला भाऊबीज निमित्त ओवाळून आली होती. मात्र शेतात फार काम असल्याने ती लवकर माहेरुन घरी आली. आपल्या पतीला, सासू-सासर्यांना शेतात मदत करण्यासाठी ती सासरी आली. पण होत्याचं नव्हतं झालं. खरिपात अतिवृष्टी झाल्याने पिकांची नासाडी झाली, पुन्हा नवा संघर्ष घेऊन हे कुटुंब महिला झटत असतानाच तिच्यावर काळाने घाला घातला.

