• Fri. Mar 20th, 2026
    शेती मशागतीनंतर झाडाखाली बसली, पाणी पिताना अचानक…; लेकरांचं आईचं छत्र हरपलं, गावात हळहळ

    Jalna News : रब्बी पिकांची मशागत करताना महिलेचा शेतातच दुर्दैवी मृत्यू झाला. झाडाखाली पाणी पीत असताना महिला खाली कोसळली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : राज्यभरात बळीराजा हा नुकताच खरिपात झालेल्या शेती पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी पिकाकडे वळला आहे. शेतशिवारात सोयाबीन काढणी, मक्का काढणी आणि रब्बी पिकांसाठी शेती मशागतीची कामं सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आता दीपावलीनंतर कामात व्यस्त असल्याचं चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अशात एक मन हेलावून टाकणारी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथे घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2025 रोजी, रविवार दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोदे तांगडा येथे अल्पभूधारक शेतकरी नारायण बोडखे यांची सर्व मुलं, नातवंडं आणि ते स्वतः शेतात रब्बी पिकांची मशागत करण्यासाठी शेतीकाम करत होते. त्यांचं शेत गावाजवळच आहे.
    Maharashtra TimesBeed News : बीडमधील कुटुंबासोबत रस्त्यात अनर्थ घडला; अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत भयंकर घडलं, आई-वडिलांचा टाहो

    लिंबाच्या झाडाखाली बसल्या आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला

    यावेळी त्यांचा दोन नंबरचा मुलगा गणेश बोडखे, याची पत्नी मनिषा बोडखे, वय 30 वर्ष, हे आपल्या संपूर्ण परिवारासह शेतात शेत मशागतीची कामं करून घरी पाणी पिण्यासाठी गेली. यावेळी ती घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून माठातून पाणी पिऊ लागले. त्याच वेळी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. एक घोट तोंडात, तर एक घोट ग्लासमध्ये ठेवून या महिलेचा जागीच जीव गेला. यानंतर तिच्या घरच्यांनी तात्काळ तिला गावातील रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं.
    Maharashtra Timesकर्जाचा सतत वाढता डोंगर, ऑनलाईन गेमिंगने आयुष्य उद्धवस्त; तरुणाचा टोकाचा निर्णय, 3 वर्षाच्या पितृछत्र हरपलं
    आपली सून, मुलांची आई हसत-खेळत असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि आपल्यातून निघून गेली. हे कळताच संपूर्ण कुटुंबाने एकच टाहो फोडला. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मनिषा बोडखे नुकत्याच आपल्या भावाला भाऊबीज निमित्त ओवाळून आली होती. मात्र शेतात फार काम असल्याने ती लवकर माहेरुन घरी आली. आपल्या पतीला, सासू-सासर्‍यांना शेतात मदत करण्यासाठी ती सासरी आली. पण होत्याचं नव्हतं झालं. खरिपात अतिवृष्टी झाल्याने पिकांची नासाडी झाली, पुन्हा नवा संघर्ष घेऊन हे कुटुंब महिला झटत असतानाच तिच्यावर काळाने घाला घातला.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा