• Fri. Mar 6th, 2026
    Beed News: ‘मला पक्षाची सत्ता आणायची आहे, मी जरांगे पाटील यांच्या…’; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

    Pankaja Munde on jarange patil: पंकजा मुंडे यांनी परळीत पक्षाचा विस्तार करत अनेक अपक्षांना पक्षात घेतले. निवडणुका जवळ असल्याने हा कार्यक्रम अराजकीय नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या जरांगे पाटील यांच्याबद्दलही बोलल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मला आता पक्षाची सत्ता आणायची आहे. आपण कोणतेही नियम न तोडता काम करायचे आहे, मात्र समोरच्यांनी जर नियम तोडले तर आपण कसे गप्प बसायचे नाही, म्हणून आम्ही देखील निर्णय घेत आहोत, अनेक अपक्षांना आता आपण पक्षात घेत आहोत. बदामराव पंडित, आणि आडसकर , आणि निर्मल यांना पक्षात घेतले आहे आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. आता युती होईल की नाही ते पक्ष ठरवेल. मात्र आम्ही काम करणार आहोत. त्यामुळेच हे सोन्यासारखे माणसं मी निवडले आहेत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या बीडमधील परळीतल्या हालगे गार्डन येथे आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

    Maharashtra TimesSatara Doctor Case: डॉक्टर तरुणी प्रकरणात माजी खासदारावर गंभीर आरोप; फलटणमध्ये जाऊन मुख्यमंत्री स्पष्टपणे बोलले, म्हणाले…
    “हा कार्यक्रम दिवाळीच्या स्नेह मिलनाचा असला तरी तो अराजकीय नाही, कारण आता निवडणुका समोर आल्या आहेत. मी आज मुद्दाम हा दिवस निवडला आहे. आपण अनेक वर्ष संघर्षाला सामोरे जात आहोत. मुंडे साहेब गेले तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझ्यासोबत सर्व ठिकाणी त्याबद्दल धन्यवाद, मी लोकसभा निवडणुकीत पडल्यावर माझ्यासाठी रडणारे आपण सर्वजण. मोठे मोठे लोक काही करू शकले नाही, त्याचा मला कधी राग आला नाही. वाईट एवढे वाटले की, लेकरांनी आत्महत्या केल्या. त्याचे मला आज देखील वाईट वाटते,” असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

    पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “म्हणून मी ठरवले आहे मी कधी हरणार नाही. मी या पक्षासाठी गोपीनाथ मुंडे यांचा पक्ष आहे म्हणून मी लढले.लोकसभेचा पराभव झाला पण मी कधी खचले नाही. मला मंत्रिपदाचा लोभ नाही. हे केवळ तुमच्यासाठी आहे. मी माझ्या घराचा एक मजला देखील वाढवला नाही.मी एकमेव आमदार आहे जी आज मंत्रिमंडळात मंत्री आहे.”

    जरांगे पाटील, मराठा व ओबीसी आरक्षणावर म्हणाल्या…

    आता मागचे सर्व विसरून जा, मी जारांगे पाटील यांच्या विरोधात कधी नाही. जरी ते चार शब्द वाईट बोलले तरी मी ते अंगाला लाऊन घेत नाही. कारण ते काही राजकीय व्यक्ती नाहीत. त्यांना कधी राजकारणात रस नाही. त्यामुळे त्यांचा मला कधीच रोष नाही.मी जरांगे पाटलांना मी एवढेच सांगेन की, मी कोणत्याही उपोषणाला येऊन दोन दिवस बातम्या लागतील, मात्र यांनी दोन समाजात तेढ निर्माण होत आहे म्हणून मी आता या पुढे आंदोलनात येणार नाही. मी समोरून पुढाकार घेणार आहे.मराठा समाजातील लोकांना म्हणेल,तुम्ही आमच्या सोबत चला. मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारा माझा तालुका प्रमुख याला मी कधी विरोध केला नाही, कारण त्याच्या समाजाच्या भूमिकेसाठी त्याला मी अडवणार नाही, कधी त्याच्यावर रागावले नाही.मी ही आमच्या ओबीसी साठी लढणार.” असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणासंबंधी भूमिका मांडली.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    दरम्यान, यावेळी पंकजा मुंडेंनी पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरही भाष्य केलं आहे, त्या म्हणाल्या की, “काही जणांनी म्हटले की, पंकजा ताईने कारखाना म्हणजे मुंडे साहेबांचा कारखाना त्यांचा आत्मा गहाण ठेवला आहे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. काही लोकांच्या कारखान्याच्या लॉकला गंज चढला आहे. त्यांना कोणी काही बोलत नाही. त्यामुळे आता आपला कारखाना हा सुरू झाला आहे. यंदा वैद्यनाथ साखर कारखाना 10 हजार गाळप देणार आहे.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा