Bachchu Kadu on fadanvis: ‘फलटण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा…’; बच्चू कडूंचा महायुतीवर हल्लाबोल, म्हणाले, ‘हे सरकार बनवाबनवी करतं’
दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मार्चपर्यंत वेळ आहे, असं म्हणतात. देशात सगळ्यात लबाड बोलणारा मुख्यमंत्री कोण असेल तर देवेंद्र फडणवीस, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. बनवाबनवी तर बनिया करत नाही, एवढी बनवाबनवी हे सरकार करत आहे, अस ते म्हणाले आहेत.
Beed News: ‘मला पक्षाची सत्ता आणायची आहे, मी जरांगे पाटील यांच्या…’; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करत नाहीत आणि व्यापाऱ्यांना सांगतात हमीभावा पेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांना माल देऊ नका. मग उरलेला माल काय भाजपच्या कार्यालयात टाकायचा का? किती ही बनवाबनवी करताय. कर्जमुक्ती, हमीभाव हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात निवडणुकीचा विचार नाही.
तेलंगणा सरकार हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे. नुकसान हो अथवा न हो. मग तुम्ही का देऊ शकत नाही, असं सवाल बच्चू कडू यांनी केला. तुम्ही शहराकडे जेवढे लक्ष देता त्याच्या 25% लक्ष ग्रामीण भागात देत नाही, शेतकरी हा जातीपातीत गुंडाळून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष द्यायचं जाती-जातीत भांडण लावायचे आणि शहरा मात्र व्यवस्थित ठेवायचं, अशी या सरकारची व्यवस्था असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. सुरजागडचा प्रकल्प तेथील लोखंड रत्नागिरीत पाठवायचे म्हणून शक्तिपीठ महामार्ग यांना करायचा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
सुरजागडच्या कंपनीचा शेअर तीन वर्षांपूर्वी 6 रुपये होता. आता तो शेअर पंधराशे रुपये कसा झाला? यामध्ये कोणाची मिली भगत आहे. त्यामुळे जाऊ तिथे खाऊ अशी परिस्थिती या सरकारची आहे. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असताना फलटण, नागपूरमध्ये अशा घटना घडतात. त्यामुळे अंकुश कुठे राहिला नाही, त्यामुळे हा राज्याचा गृहमंत्री जनतेचा नसून फक्त भाजपचा कार्यकर्त्यांच्या आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. फलटणच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नाही तर कमीत कमी माफी तर मागावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

