Nanded Crime: नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. किनवट तालुक्यात एका महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरु होते.
४५ वर्षीय मयत मंगल कोंडीबा धुमाळे ह्या अविवाहित असून किनवट तालुक्यातील पाटोदा येथील रहिवासी आहेत. मंगल गावात एकटी राहत होती. गावातील कृष्णा जाधव (वय ३५) या युवकासोबत त्या महिलेचे प्रेम संबंध सुरु होते. कृष्णा हा नेहमी मंगल यांच्या घरी यायचा. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. मंगलला माझ्याशी लग्न कर असा तगादा कृष्णा लावत होता. याच कारणावरून कृष्णा आणि मंगलचे वाद व्हायचे.
Raigad News: ‘पिक्चर अभी बाकी है…’ म्हणत सुनील तटकरेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; सत्ता समीकरण बदलणार?शनिवारी रात्री आरोपी हा महिलेच्या घरी गेला असता दोघामध्ये भांडण झाले. यावेळी कृष्णाने गळा आवळून मंगलचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मयताची आई घरी गेली असता, त्यांना आपली मुलगी निपचित अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच किनवट पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आल्याने पोलिसांना कृष्णावर संशय आला.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
शिवाय घटनेनंतर आरोपी घरातून पळून जाताना मयत महिलेच्या बहिणीने पहिले अशीही माहिती आहे. दरम्यान कृष्णाने मंगलला माझ्यासोबत लग्न कर म्हणून मारहाण केली आणि खून केला अशी तक्रार मयत महिलेचा भाऊ दत्ता कोंडीबा धुमाळे यांनी दिली आहे. या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी कृष्णा जाधव विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने किनवट तालुक्यात खळबळ उडाली आहे.

