• Sat. Jun 6th, 2026

    Buldhana Crime : नवरा-बायकोचं प्रवासात भांडण, पत्नी अर्ध्या रस्त्यातून माहेरी, पतीने पोटच्या लेकींना संपवलं; महाराष्ट्र हादरला

    Buldhana Crime : नवरा-बायकोचं प्रवासात भांडण, पत्नी अर्ध्या रस्त्यातून माहेरी, पतीने पोटच्या लेकींना संपवलं; महाराष्ट्र हादरला

    Buldhana Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशीच एक संतापजनक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादातून नवऱ्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची हत्या केलीय.

    दोन मुलींची वडिलांनी हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून हत्या केली आहे. पती पत्नीतील वादातून झालेल्या या दुहेरी हत्याकांडांनं बुलढाणा जिल्हा हादरला आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण, जो पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करतो, याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायको यांच्यात वाद सुरु झाला. या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला. रागाच्या भरात खामगाव-जालना मार्गावरील अंढेरा फाट्याजवळील जंगलात त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्घृणपणे हत्या केली. या घटनानंतर राहुलने स्वतः वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबूली दिली. पोलिसांनी तात्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत. संपूर्ण परिसरात या घटनेनं खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी राहुल अंढेरा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

    Maharashtra Times‘आई स्वयंपाक करून ठेव’, म्हणत अक्षय घरातून गेला, तो पुन्हा परतलाच नाही, बेपत्ता तरुणाच्या शोधात मोठी माहिती समोर; महाराष्ट्र हादरला

    बेपत्ता तरुणाच्या शोधात मोठी माहिती समोर

    अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अक्षय नागलकर नावाचा तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. 22 ऑक्टोबरपासून बेपत्ता तरुण अक्षयचा शोध घेण्यात येत होता. मात्र, या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अक्षय नागलकर याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्व वैमानस्यातून हे मोठं हत्याकांड घडलं आहे.

    Maharashtra TimesCrime News : बॅनर फाडल्यावरुन किरकोळ वाद, बेदम मारहाणीत 17 वर्षीय तरुणाला संपवलं; सणासुदीत आई-वडिलांचा हंबरडा

    गेल्या तीन दिवसांपासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसतात. प्रत्येक वेळेस फक्त ‘तपास सुरू आहे’, एवढंच उत्तर त्यांना मिळत असल्यानं त्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढली होती. या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयला शोधण्याची मागणी केली होती. ‘अक्षय जिवंत आहे की, त्याच्यावर काही अनर्थ ओढवला आहे. याचा तरी उलगडा लवकर करावा’, अशी आर्त मागणी अक्षयच्या वडिलांकडून केली जात होती. अखेर घडलं वाईटच. अक्षय नागलकर याची त्याच्या साथीदारांनीच हत्या केल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे. एकूण आठ जणांनी अक्षयची हत्या केली. तर पोलिसांनी यापैकी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचं कारण पोलिसांनी जुना वाद म्हणून सांगितलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा