Nagpur Politics: काटोल आणि हिंगण्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क असले तरीसुद्धा या विधानसभासुद्धा भाजपच्याच तावडीत आहेत. त्यामुळे येथील आमदारदेखील राष्ट्रवादीशी युती करण्याच्या मताचे नसल्याचे कळते.
सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात महायुती व्हावी अशी काही बड्या नेत्यांची इच्छा आहे. तरीसुद्धा या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. या निवडणुकांमध्ये त्यांना संधी अतिशय महत्त्वाची असते, अशीही भूमिका अनेकांनी घेतली आहे. आपआपला पक्ष वाढविण्यासाठीही हीच संधी असते. त्यामुळे या निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी स्वबळाचाच नारा दिला जातो आहे. अशात नागपूर जिल्हा परिषदेतही भाजप राष्ट्रवादीला जागा सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
विदर्भाला दिवाळी भेट; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा, कोट्यवधींचा खर्च करणार
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे रामटेक विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला काही जागा सुटण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप नेत्यांच्या मते जिल्ह्यात राष्ट्रवादीचे फारसे नेटवर्क नाही. सहा पैकी चार विधानसभांमध्ये भाजपचेच आमदार आहेत.
Nagpur Crime : उधारीचे पैसे देण्यास उशीर, पंपावर पेट्रोल भरण्यास गेला असता युवकावर हल्ला; जखमी तरुणाचा उपचारादरम्यान करुण अंत
– तर भाजपला अडचण जाणार!
राष्ट्रवादीच्या एका नेत्याने अजित पवार यांना अलीकडेच एक सविस्तर मेसेज पाठविल्याचे कळते. यात ‘भाजप जिल्ह्यात राष्ट्रवादीला दुय्यम वागणूक देत असून आपल्या हाती फारसे काही लागणार नाही. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्याच धर्तीवर नागपूर जिल्ह्यात दोन्ही पवारांनी एकत्र यावे. जिल्ह्यात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास भाजपला अडचण जाऊ शकते’, असे मत या नेत्याने व्यक्त केले आहे. यावर अजित पवारांची काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागून आहे.

