Chandrashekhar Bawankule: भंडारा भाजपमध्ये असलेली गटबाजी थांबवा, ती संपवा असे चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
भंडारा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या दिवाळी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे आणि भाजप नेते जॅकी रावलानी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’
बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. पराभवाचा परिणाम सुनील मेंढे यांच्यावर झाला नाही, परंतु पक्षाचे नुकसान झाले. त्याचे परिणाम सर्वांना स्पष्ट आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भीती निर्माण केली. यानंतर कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने विधानसभा निवडणूक लढविली. परिणामी, साकोलीमध्ये नाना पटोले यांचा केवळ २०८ मतांनी विजय झाला, असेही त्यांनी सांगितले.
कुणी नेता असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पत्नीला तिकीट मिळणार नाही . जर त्यांनी ५१ टक्के मतांची हमी दिली तरच पक्ष त्यांना तिकीट देईल. बावनकुळे यांनी सर्वांना पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी शपथ घेण्याचे आवाहन केले .
राज्य सरकारकडून आमदारांच्या निधीवाटपात दुजाभाव? विजय वडेट्टीवार यांचा धक्कादायक आरोप
चारही नगरपरिषदा लढवण्याची तयारी
भाजपने भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर या चारही नगरपरिषदांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले.

