Kolhapur Crime News: क्षुल्लक कारणातून झालेल्या वादतून कोल्हापुरात मित्रांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
वाढदिवसाची पार्टी ठरली हाणामारीची
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश संभाजी भोसले (वय 34, रा. वेताळमाळ तालीम, शिवाजी पेठ) याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी सरनाईक कॉलनी परिसरात पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या मित्रांमध्ये अक्षय साळोखे आणि त्याचा भाऊ अजिंक्य साळोखे (रा. सरनाईक कॉलनी) उपस्थित होते. पहाटे तीनच्या सुमारास सर्वजण दारूच्या नशेत असताना किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. वाद वाढताच अजिंक्यने बीअरची बाटली उचलून आकाशच्या डोक्यात फोडली. बाटलीचे तुकडे लागल्याने आकाश जखमी झाला.
तो तिथे एकटा आहे, त्याची खूप आठवण येतेय; भाऊ गेल्याचं दु:ख सहन होईना, एकत्र जन्म घेऊ म्हणत तरुणाने जीव दिला
जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचार
घटनेचा राग येऊन आकाशने आपल्या जवळील चाकू काढून अजिंक्यवर हल्ला केला. यात अजिंक्यच्या पोटाच्या भागाला खोलवर जखम झाली. या दोघांमधील भांडण सोडवताना अक्षयलाही किरकोळ इजा झाली. जखमींना त्वरीत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आकाश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अजिंक्यच्या विरोधातही मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या दोन्ही पक्षांतील वादाचे कारण समजण्यासाठी पोलिस तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शी मित्रांच्या जबाबांवरून घटनेचे सविस्तर चित्र उभे राहिले आहे.
कंपनीने कमी बोनस दिला, कर्मचाऱ्यांनी टोल गेट उघडलं; 5000 गाड्यांना टोल फ्री, 30 लाखांचं नुकसान
शहरभर चर्चेचा विषय
दरम्यान, शिवाजी पेठेतील मध्यवस्तीमध्ये घडलेली ही मारामारी स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. वाढदिवसाचा आनंद क्षणात हिंसेत बदलल्याने नागरिकांमधून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून अशा पार्ट्यांमध्ये बेकायदेशीर मद्यसेवन आणि मारामारी थांबवण्यासाठी गस्त वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

