Yavatmal Farmer Ends Life: मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग व त्यातच शेतमालाच्या पडलेल्या किमतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.
कळंब तालुक्यातील तिरझडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष वसंत ठुसे (३५) यांनी १८ ऑक्टोबरला सायंकाळी गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकांचे कर्ज वाढत असल्याने ते सतत काळजीत राहत होते. यातच त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेकडे तगादा, संतापात आरोपीचा वस्तऱ्याने गळा चिरला; 21 वर्षांपूर्वीच्या घटनेचा कोर्टात धक्कादायक निकाल लागला
दुसरी घटना बाभूळगाव तालुक्यातील हस्तापूर येथे १९ ऑक्टोबर रोजी घडली. हरिदास झिंगूजी शिवरकर (६०) यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील सोयाबीन आणि तुरीचे नुकसान झाल्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मुलाने बाभूळगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यावर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह बाभूळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.
Latur Crime : कुटुंबाचा प्रेमसंबंधांना विरोध, MPSC करणाऱ्या तरुणाने नर्स प्रेयसीसह आयुष्य संपवलं, नितीन-राणीचा करुण अंत
तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील लोही येथे १९ ऑक्टोबर रोजी घडली. नितीन चव्हाण, असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. कर्ज काढून आणि उसनवारी करून त्यांनी पेरणी केली होती. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ही परतफेड करणार होते. अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. या विवंचनेत असतानाच चव्हाण यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हे वर्ष चांगले जाईल अशी अपेक्षा असताना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. शासनाची मदत मिळत असली तरी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ती अत्यंत तोकडी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

