Sharad pawar speech, baramati: शरद पवारांनी बारामतीमध्ये तरुणांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं आहे. जे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
शरद पवार हे मागील चार दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. सोमवारी पवारांच्या उपस्थितीत एक खाजगी कार्यक्रम पार पडला.यावेळी पवार होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पहिल्यांदा जेव्हा जनतेने मला राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. तेव्हा पहिला निर्णय मी असा घेतला की, बारामतीत एमआयडीसी काढायची. दुधावर प्रक्रिया करणारी डायनामिक्स सारखी कंपनी आणायची. या कामासाठी काही लोकांनी खूप सहकार्य केलं.
Pune News: ‘शनिवार वाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’; शनिवारवाड्यातून रुपाली पाटलांचा मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्लाबोल
त्यामध्ये रुई, सावळ, वंजारवाडी येथील शेतकऱ्यांना विचारले की मला इथे कंपनी आणायची आहे. तुम्ही मला जागा द्याल का. त्यावेळी शेतकऱ्यांनी दोन्ही हात वर करून संमती दिली. आणि त्यानंतर उद्योगाचे केंद्र म्हणून बारामतीकडे पाहिलं जाऊ लागलं. पुढे शिक्षणाच्या सोयी केल्या. याचा परिणाम असा झाला की, विविध राज्यात मी ज्यावेळेस फिरतो तेव्हा अनेक मुलं मुली सांगतात की मी बारामतीत शिक्षण घेतल आहे.
वंजारवाडी गावाला शरद पवारांची भेट
बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी अनेक वर्षानंतर भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी गावातील युवकांच्या रोजगारां संदर्भात माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी रोजगार संदर्भात असणाऱ्या विविध समस्या शरद पवारांसमोर मांडल्या. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत, त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. स्थानिक युवकांना बारामती, एमआयडीसीत अनेक कंपन्यांमध्ये स्थान दिले जात नाही.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
स्थानिक असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. त्यांना डावलले जाते. या समस्या शरद पवारांनी जाणून घेतल्या. तसेच नव्या पिढीला रोजगार मिळवून देण्यासाठी तयारी दाखवली. असल्याची माहिती वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे यांनी दिली.

