Laxman hake letter to cm: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या पत्रात नेमकं काय आहे?
दरम्यान, राज्य सरकारने मुंबईतील आझाद मैदानातल्या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या. विविध जीआरमार्फत मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिले जात आहेत. यावर टीका करत आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात ओबीसी आरक्षण संपल्याचा केला दावा केला आहे. बोगस दाखले काढून संरजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अनधिकृत ताबे मारत आहेत, जरांगे हा फक्त मुखवटा आहे. त्यांच्याआडून क्रुर मराठा राजकीय नेते आमदार, खासदार, कारखानदार ओबीसी आरक्षण संपवत असल्याचा आरोप हाकेंनी या पत्रातून केला आहे.
‘त्या’ अपघातात कुटुंबाने एकुलता एक लेक गमावला, दिवाळी सुट्टीत घरी आलेला विद्यार्थी देव दर्शनाला गेला अन् अनर्थ घडला
लक्ष्मण हाकेंचं संपूर्ण पत्र
मा. मुख्यमंत्री महोदय, मी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके,
आपणास तमाम ओबीसी बांधवांकडून सप्रेम नमस्कार,
विषय : ओबीसी आरक्षणाची मसलत संपल्याचा !
मुख्यमंत्री महोदय,
गेल्या ७ वर्षांपासून पंचायतराज निवडणूका झाल्या नव्हत्या. २०२२ पुर्वचे आरक्षण ग्राह्य धरुन पंचायतराज निवडणूका घ्या, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसींना थोडंसं हायसं वाटलं. अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक ते महापौर ओबीसी जागेवर होण्याची गुलाबी स्वप्ने पडू लागली पण जरांगें नावाच्या गोलमाल योद्धयाने मुंबई गाठली. सरकारच्या मानगुटीवर बसून हैद्राबाद गॅझेटचा जीआर मंजूर करुन घेतला.
बोगस दाखले काढून संरजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अनधिकृत ताबे मारत होते. या बेकायदा जी आर मुळे अशा टोळीला १२ हत्तींचं बळ मिळालंय. हैद्राबाद गॅझेट मुळे कुळातील – गावातील – नातेसंबधातील लोकांना एका ऑफिडिट द्वारे कुणबीकरणाद्वारे ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे साहेब ? हा जी आर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्याने सांगतो साहेब. जे नारायण राणे समितीला जमले नाही , जे गायकवाड आयोगाला जमले नाही ते तुम्ही केलंय , कोर्टात या जी आर ला किती अर्थ आहे हे आम्हाला माहिती आहे पण आज रोजी ओबीसी आरक्षण संपलंय कारण सुप्रीम कोर्टाच्या भाषेत मराठा जात शासनकरती जात आहे त्यांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल साहेब.
आणि हो साहेब आम्ही वारंवार सांगतोय जरांगे हा फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून क्रुर मराठा राजकीय नेते आमदार – खासदार – कारखानदार त्यांचा हेतू साध्य करतायेत. प्रस्थापित मराठा समाजाला सरंपचपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायची आहेत. गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगेला देणं घेणं नाही. ईब्लुएसच्या कटऑफचा फरक ओबीसींहून १५ ते २० गुणांनी कमी आहे. यामुळं गजरवंतांची शेकडो लेकरंबाळं पायावर उभारली असती. त्यांचं आयुष्य जरांगे व त्यांच्या आकांनी उध्वस्त केलंय. आम्ही ओबीसी बांधव आतडी तुटोसतर ओरडून सांगतोय बलूता अलुता सामाजिक मागास यांच्या स्पर्धेत कसा टिकेल हो !
ओबीसी समाजाचं आरक्षण संपलंय, शरद पवार- पंडित-विखे ते जरांगे, लक्ष्मण हाकें नी धू-धू धुतलं
जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता यात बळी मात्र ओबीसीचा आणि भटक्या जातसमूहाचा गेलाय, घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचं बाबासाहेबांच स्वप्न या एका जी आर द्वारे आपण संपवलाय.
-लक्ष्मण हाके

