सोलापूर जिल्ह्यात निवडणूक आयोगाविरोधात मोठा संताप व्यक्त केला जात आहे.१ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचे शिवसैनिकांनी ठरवलेय. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मुंबईत ताकद दाखवणार असं सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.