Nandurbar Chandhshaili Ghat Pick Up Accident : नंदुरबारमधील चांदशैली घाटात ऐन दिवाळीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घोटाणे गावातील पाच तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
अपघात कसा झाला?
सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे अश्वत्थामा ऋषींची दरवर्षी यात्रा भरते. गेल्या दोन दिवसापासून यात्रा सुरू झाली असून. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यातील हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात. दरम्यान, अश्वत्थामा ऋषींचं दर्शन घेऊन परतणाऱ्या पिकअप वाहनाचा तळोदा ते धडगाव दरम्यान असलेल्या चांदशैली घाटातील माकड टेकडीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील पवन गुलाब मिस्तरी (वय 24), बापू छगन धनगर (वय 24), चेतन पावबा पाटील (वय 23), भूषण राजेंद्र गोसावी (वय 30), राहुल गुलाब मिस्तरी (वय 22) आणि नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील हिरालाल जगन फडके, योगेश लक्ष्मण ठाकरे आणि नंदुरबार शहरातील गणेश संजय भील (वय 15) अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
जेव्हा कुंपणच शेत खातं; साई संस्थानच्या 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
तर क्रिष्णा अशोक मिस्तरी (रा. घोटाणे), रविराज ठाकरे (रा. बालदा), कृष्णा पाडवी (रा.बालदा), परविन संजय वाघ, अर्जुन चुनीलाल सोनवणे (रा.तळोदा), राहुन राजसिंग ठाकरे (रा. समशेरपुर नंदुरबार), दिपक हिम्मत गोसावी (रा. घोटाणे, नंदुरबार), सागर चुडामन पाटील (रा.घोटाणे), सागर राजु ठाकरे (रा. समशेरपुर), नमन मुकेश गायकवाड (रा.तळोदा), जयेश महेंद्र मिस्तरी (रा.घोटाणे), गणेश सुभाष गोसावी (रा.घोटाणे), दिनेश सतीलाल ठाकरे (रा. कोळदा), बापु खंडु पाटील (वय 15, रा. घोटाणे) आणि कार्तिक योगेश थोरात हे भाविक जखमी झाले आहेत. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
Ajit Pawar : ‘दादा, डिव्हायडर मोठे करा, कुत्री उड्या मारतात’; तक्रार ऐकून अजितदादा डोक्यावर हात मारत म्हणाले…
या वाहनात सुमारे 40 भाविक असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बहुतांशी नंदुरबार तालुक्यातील भाविक आहेत. अस्तंबा यात्रेसाठी गेल्या दोन दिवसापासून हजारो भाविक जाताना पायी तर परत त्यांना मिळेल त्या वाहनाने गावाकडे धनत्रयोदशीला परतत असतात. धनत्रयोदशीच्या दिवशीच भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्यानं जिल्हाभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा
