Vijay Wadettiwar On Mahayuti: शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
वडेट्टीवार शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल बोलताना ते म्हणाले, राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू असे सांगितले पण जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, घरे पडली आहेत. २५३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे, पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. त्यात जास्तीची मदत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडल्या आहेत त्यांना दिलेली मदत तीन वर्षांत मिळणार आहे.
Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवा; आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना आठवलेंची ‘ऑफर’
कापूस खरेदीला अजूनही सीसीआयकडून परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी टाकलेल्या अटी जाचक आहेत, त्यामुळे कापूस खरेदी करताना हात आखडता घेतला जाणार आहे, यामुळे शेतकरी बरबाद होऊन जाईल. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक गेले आहे त्यात मिळणारा भाव इतका कमी आहे की शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा हा छळ करू नये अशी टीका त्यांनी केली.
20 हजार कोटींच्या व्यवहारांची नोंदच नाही; 25 उपनिबंधक कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई
जीआर रद्द करण्याची जबाबदारी सरकारवर
मराठवाड्यात निघणाऱ्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला शुभेच्छा देताना वडेट्टीवार म्हणाले, बीडमध्ये होणाऱ्या मोर्चात सरकारमधील दोन मंत्री आणि धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर सारखे पॉवरफुल आमदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे इतका मोठा मोर्चा झाल्यावर २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द हा झालाच पाहिजे. हा जीआर सरकारने काढला आहे. त्यामुळे तो रद्द करण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर येते, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

