Ramdas Athawale: रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवा, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना रामदास आठवलेंनी ऑफर दिली. काय म्हणाले नेमकं?
गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून हिंसेचा मार्ग सोडला. मुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांना भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. याबाबत विचारले असता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘नक्षलवाद्यांच्या त्यागाबाबत आम्हाला सहानुभूती आहे. अनेक उच्चशिक्षित लोक यात आले. परंतु, त्यांनी स्वीकारलेला हिंसेचा मार्ग मान्य नाही. नक्षलवाद्यांना आता हिंसेचा मार्ग योग्य नसल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे ज्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, त्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि ज्यांनी अजूनही हिंसेचा मार्ग सोडलेला नाही, त्यांनीही शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही मी यानिमित्ताने करतो.’
20 हजार कोटींच्या व्यवहारांची नोंदच नाही; 25 उपनिबंधक कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई
रिपाइंचे अनेक गट असले तरी देशभरात केवळ आमचाच रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. दोन राज्यांत आमचे आमदार आहेत. आणखी दोन राज्यांत आमदार आले तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. पुढील वर्षी आमचा तसा प्रयत्न राहील. याचदृष्टीने पुढीलवर्षी ८ मार्च रोजी नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर रिपाइंचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला पूरणचंद्र मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे, विनोद थूल उपस्थित होते.
शिवसेना-एनसीपीत फूट, अनेकांनी साथ सोडली; भाजपला ‘भगवा गड’ पुन्हा राखता येईल का?
बिहारमध्ये नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
बिहारच्या निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच जाहीर केले होते. त्यामुळे नितीशकुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत, असेही केंद्रीय मत्री आठवले यांनी स्पष्ट केले. मतचोरीचा आरोप करणाऱ्या इंडिया आघाडीला ‘लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाली का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना थोडा फायदा होईल. पण, मुंबईत सरशी महायुतीचीच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

