नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड बघायला मिळाली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना आज मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण त्यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारत कोकाटे हे यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. भारत कोकाटे यांनी पक्षप्रवेशानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “राजकीय जीवनात काम करत असताना स्वतःला काय मिळेल यापेक्षा कार्यकर्त्यांना काय देऊ शकतो हे महत्त्वाचं असतं. मात्र, मी ४ वर्षांपासून कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही. उबाठा गटात प्रवेश केला तेव्हा मला काम करता आले नाही”, अशी खंत भारत कोकाटे यांना यावेळी व्यक्त केली.
“आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मला आता पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतात, तो आदर्श मी घेतला आहे आणि त्यासाठीच मी पक्षात प्रवेश केला”, अशी प्रतिक्रिया भारत कोकाटे यांनी दिली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबतच्या संबंधांवरही त्यांनी भाष्य केलं. “मी कुणावरही नाराज नाही. माझे बंधू आणि माझ्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, पण कौटुंबिक कलह नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “त्यांनी राजकारणात स्थान निर्माण केलेय, तसेच मीही करेन. राजकारणात कोणीही इच्छूक असू शकते,” असे म्हणत त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षाही बोलून दाखवली.
भाजपमध्ये आता सामान्य लोकांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. “छोट्या-छोट्या समस्या असतात, त्या सोडवायच्या आहेत. रेशन कार्ड आणि इतर समस्या असतात,” असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी पक्षाचा कोणताही आदेश मान्य असेल असे स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांचा भाजप प्रवेश हा सिन्नर आणि नाशिकच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भारत कोकाटे यांची भूमिका भाजपसाठी किती महत्वाची ठरते हे बघणे महत्त्वाचे आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा