• Fri. Mar 6th, 2026
    Unique Village : संध्याकाळनंतर गावात रडण्यास बंदी, कोकणातील हे गाव कोणतं? फास्ट जगात आजही जपली जातेय अनोखी प्रथा

    Unique Villages of Maharashtra : राज्यातील एका गावात अनोखी परंपरा आहे. आज जग टेक्नोलॉजीच्या काळात पुढे गेलं असतानाही या गावची परंपरा टिकून आहे. या गावात संध्याकाळनंतर कोणीही रडू शकत नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील प्रत्येक गावा-गावांत विविध प्रथा, परंपरा असतात. पण सर्वसाधारणपणे राज्यभरातील जवळपास प्रत्येक घरात एक नियम सारखाच असतो, तो म्हणजे संध्याकाळी घराघरात दिवे लावले जातात. तसंच संध्याकाळच्या वेळी काही घरांमध्ये काही गोष्टींचं काटेकोर पालन केलं जातं. महाराष्ट्रात असंच एक गाव जे एका संध्याकाळच्या एका खास प्रथेसाठी ओळखलं जातं. गावातील लोकांना संध्याकाळ झाल्यानंतर रडण्यास मनाई आहे. म्हणजेच संध्याकाळी दिवेलागणीपासून नंतर संपूर्ण रात्रभर, सकाळी होईपर्यंत गावातील कोणीही रडू शकत नाही. हे वाचून विचित्र वाटत असलं, तर राज्यातील या गावात ही प्रथा काटेकोरपणे पाळली जाते.

    कोकणातील गावात संध्याकाळपासून रडण्यास बंदी

    संध्याकाळी रडण्यास बंदी असलेलं हे गाव आहे कोकणातील सिंधुदुर्गातील श्रावणगाव. या गावात अनोखी परंपरा आहे. संध्याकाळी न रडण्यामागे एक खास गोष्ट आहे. या गावाची ग्रामदेवता हिंसाचाराविरोधात आहे. त्यामुळेच या गावात भाडणं करणं मान्य नाही. तसंच गावातील लोक पूर्णपणे शाहाकारी आहेत. शिवाय संध्याकाळपासून कोणीही गावात रडलं, तर ग्रामदेवता क्रोधीत होऊन शाप देते असं मानलं जातं. गावातील एखाद्या घरात भांडणाचा, रडण्याचा आवाज आला, तर त्या घरातील सदस्यांना ज्येष्ठ लोकांसमोर भांडणाचं, रडण्याचं कारण, स्पष्टीकरण द्यावं लागतं.
    Maharashtra TimesUnique Village : देशातील एकमेव ‘फळांचं गाव’ महाराष्ट्रात, एकाच ठिकाणी ३० पिकं; शेतीमागे आहे खास वैशिष्ट्यं

    गावाने आजही जपली आहे जुनी परंपरा

    आज टेक्नोलॉजीच्या काळातही कोकणातलं हे गाव त्यांची जुनी परंपरा जपून आहेत. त्यांनी जपलेल्या परंपरेमुळेच त्यांच्या गावावर येणारी कोणतीही संकटं किंवा आपत्ती टाळली जात असल्याची त्यांची श्रद्धा आहे. या परंपरेमुळे राज्यभरात या गावाची खास ओळख आहे.
    Maharashtra TimesUnique Village : मुंबईपासून चार तासांवर लहानसं काजव्यांचं गाव, लखलखतं अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

    गावाची खास ओळख

    कोकणातील या श्रावणगावाची आणखी एक खास ओळख आहे. या गावात एक तलाव आहे. याच तलावात श्रावणकुमारचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं. श्रावणकुमार त्यांच्या आई-वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी तलाव गेले असताना त्यांना दशरथ राजाने मारलेला धनुष्यबाण लागला आणि बाण डोळ्यात लागल्याने तलावातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जाते.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा