Unique Villages of Maharashtra : राज्यातील एका गावात अनोखी परंपरा आहे. आज जग टेक्नोलॉजीच्या काळात पुढे गेलं असतानाही या गावची परंपरा टिकून आहे. या गावात संध्याकाळनंतर कोणीही रडू शकत नाही.
कोकणातील गावात संध्याकाळपासून रडण्यास बंदी
संध्याकाळी रडण्यास बंदी असलेलं हे गाव आहे कोकणातील सिंधुदुर्गातील श्रावणगाव. या गावात अनोखी परंपरा आहे. संध्याकाळी न रडण्यामागे एक खास गोष्ट आहे. या गावाची ग्रामदेवता हिंसाचाराविरोधात आहे. त्यामुळेच या गावात भाडणं करणं मान्य नाही. तसंच गावातील लोक पूर्णपणे शाहाकारी आहेत. शिवाय संध्याकाळपासून कोणीही गावात रडलं, तर ग्रामदेवता क्रोधीत होऊन शाप देते असं मानलं जातं. गावातील एखाद्या घरात भांडणाचा, रडण्याचा आवाज आला, तर त्या घरातील सदस्यांना ज्येष्ठ लोकांसमोर भांडणाचं, रडण्याचं कारण, स्पष्टीकरण द्यावं लागतं.
Unique Village : देशातील एकमेव ‘फळांचं गाव’ महाराष्ट्रात, एकाच ठिकाणी ३० पिकं; शेतीमागे आहे खास वैशिष्ट्यं
गावाने आजही जपली आहे जुनी परंपरा
आज टेक्नोलॉजीच्या काळातही कोकणातलं हे गाव त्यांची जुनी परंपरा जपून आहेत. त्यांनी जपलेल्या परंपरेमुळेच त्यांच्या गावावर येणारी कोणतीही संकटं किंवा आपत्ती टाळली जात असल्याची त्यांची श्रद्धा आहे. या परंपरेमुळे राज्यभरात या गावाची खास ओळख आहे.
Unique Village : मुंबईपासून चार तासांवर लहानसं काजव्यांचं गाव, लखलखतं अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
गावाची खास ओळख
कोकणातील या श्रावणगावाची आणखी एक खास ओळख आहे. या गावात एक तलाव आहे. याच तलावात श्रावणकुमारचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं. श्रावणकुमार त्यांच्या आई-वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी तलाव गेले असताना त्यांना दशरथ राजाने मारलेला धनुष्यबाण लागला आणि बाण डोळ्यात लागल्याने तलावातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जाते.

