Ghodbunder Road Traffic Update: ठाणे-घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना चार दिवस बंदी घालण्यात आली आहे. कसे असेल नियोजन? जाणून घ्या…
गायमुख घाटातील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. परिणामी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ऑगस्टमध्ये हाती घेतले होते. परंतु, ते निम्मेच काम करता आले होते.
‘आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज’; ठाण्यात राजन विचारे-अविनाश जाधव एकत्र, शिंदे सेनेला दिला इशारा; म्हणाले, ‘आमची सत्ता येईल तेव्हा…’
गणपती व नंतर नवरात्रोत्सवामुळे रस्त्याच्या कामामुळे कोंडी होण्याची शक्यता असल्याने ते हाती घेता आले नव्हते. मात्र, आगामी काही दिवसांत दिवाळी सण सुरू होणार आहे. त्यापूर्वी शनिवारपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे रखडलेले उर्वरित काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.
Thane News : ठाण्यात आमदाराला अश्लील व्हिडिओ पाठवले, दहा लाखांची मागणी, महिलेवर गुन्हा
बंदी कालावधीत पालघरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना शिरसाट फाट्यापासून गणेशपुरी आणि चिंचोटी खरबाव मार्गे, गुजरातहून येणाऱ्या वाहनांना मनोर येथून वाडा नाकामार्गे, तर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने मानकोलीमार्गे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हलक्या वाहनांना मात्र या मार्गावरून जाता येणार आहे.
मुंबईसह ठाणे, पुणे जाम करू!
महायुती सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय ओबीसींवर अन्याय करणारा आहे, तो रद्द करावा, या मागणीसाठी पिवळी टोपी परिधान केलेले शेकडो ओबीसी बांधव शुक्रवारी संविधान चौकात धडकले. ‘नागपुरात झालेली ओबीसी एकजूट झलक आहे, तुम्ही ओबीसींकडे दुर्लक्ष कराल तर मुंबई, पुणे, ठाणे जाम करू’, असा इशारा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.

