Devendra Fadnavis: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक शुक्रवारी पंचवटीतील स्वामी नारायण कन्व्हेक्शन सेंटरमध्ये झाली.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने विभागनिहाय बैठकी घेतल्या जात आहेत. त्या-त्या विभागांमधील जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, आणि महापालिकांसंदर्भात आढावा घेतला जात आहे.
Mama Rajwade : ठाकरे गटाला ‘मामा’ बनवून भाजपमध्ये, आता त्याच प्रभावशाली नेत्याला अटक, कोणत्या प्रकरणात कारवाई?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संघटनात्मक परिस्थिती, बूथरचना, मागील निवडणुकांमधील परिस्थिती, युती कशी व कुठे होऊ शकते, अशा सर्व गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. आज आम्ही उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले होते. या वेळी त्यापेक्षाही अधिक चांगले यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’
गुन्हेगारांना सोडणार नाही
नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्तांना पूर्णत: मोकळीक देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले. गुन्हेगार भाजपचे असो वा अन्य कोणत्याही पक्षाचा, कुणालाही सोडू नका, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
फांद्या छाटताना मोठा अनर्थ; सिगरेटची ठिणगी पडून डिझेल कॅनचा स्फोट, नाशकात 6 जण होरपळले
पुण्यातील गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्रपरवाना देण्यासंदर्भात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले जात आहेत; परंतु त्यांनी केवळ सुनावणी घेतली होती. हा परवाना घायवळला देण्यात आलेला नाही. पोलिस आयुक्तांनी तसे स्पष्ट केले आहे. परवाना दिला असता, तर कदाचित विरोधकांनी केलेला आरोप योग्य आहे, असे म्हणता आले असते, असे नमूद करून घायवळ प्रकरणात उबाठाचे आमदार अनिल परब यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. संघटनात्मक परिस्थिती, बूथरचना, मागील निवडणुकांमधील परिस्थिती, युती कशी व कुठे होऊ शकते, अशा सर्व गोष्टींचा आढावा घेतला जात आहे.– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

