Nashik News : नाशिक शहराचे महत्त्वाचे पद भूषवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ‘मामा’ बनवणात भाजप प्रवेश करणाऱ्या नेत्याला अटक झाली आहे
अगदी काही तासच नाशिक शहराचे महत्त्वाचे पद भूषवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ‘मामा’ बनवणाऱ्या आणि भाजपच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करु पाहणाऱ्या मामा राजवाडे यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. सुरुवातीला, कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये यापुढे सहभाग राहणार नाही याची खबरदारी घेण्याची तंबी त्यांना देण्यात आली होती. तसंच सहकार्याची हमीही त्यांच्याकडून घेण्यात आली होती.
कोण आहेत मामा राजवाडे?
ठाकरे गटाचे तत्कालीन महानगरप्रमुख विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागताच मामा राजवाडे यांची त्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीनंतर जेमतेम चार ते पाच दिवसातच मामांनीही शिवबंधन सोडलं होतं. दरम्यानच्या काळात राजवाडेंचा भाजप प्रवेश काही काळ रखडला होता, मात्र यथावकाश त्यांना प्रवेश मिळाला.
काय आहे प्रकरण?
पूर्ववैमनस्यातून एका तरुणाच्या दिशेने गोळी झाडून अपहरण करीत बेदम मारहाण झाल्याचा थरार २९ सप्टेंबरच्या पहाटे रामवाडी व्हाया गंगापूररोड रस्त्यावर रंगला होता. त्याबाबत तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राणेनगरात राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके (वय २८) याने सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. साळुंकेचा गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. साळुंके यापूर्वी रामवाडीजवळील आदर्शनगरात वास्तव्यास होता. २९ सप्टेंबर रोजी पहाटे त्याच्यावर गोळी झाडून अपहरण करत मारहाण करण्यात आली. या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या साळुंकेने रविवार ५ ऑक्टोबरला रात्री उशिराने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांत संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला.
Navi Mumbai Airport : विमानतळाचं उद्घाटन पण ‘दिबां’च्या नावाची घोषणा नाही, कोण होते दि. बा. पाटील ?
गरबा, पार्टी अन् पूर पाहणी
२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता साळुंके व त्याचा शालक ऋषिकेश जाधव दांडिया खेळण्यासाठी निघाले. मित्र सचिन सांगळे आणि हरिश साळुंके यांना फोन करुन ‘दांडिया खेळण्यासाठी उपनगरकडे जात आहोत. तुम्ही पण या’, असे ते म्हणाले. चौघेही टाकळी परिसरात गरबा खेळून रात्री ९.३० वाजता जेवणासाठी गंगापूर रोडकडे निघाले. रात्री १०.३० ते मध्यरात्री १२.३० पर्यंत गंगापूर रोडवरील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये बसून त्यांनी ‘गप्पागोष्टी’ केल्या. त्यानंतर गोदावरी नदीचा पूर बघण्यासाठी चौघे निघाले.
हरिशला उशीर होत असल्याने अशोक स्तंभावर सोडून तिघेही संत गाडगे महाराज पुलावर पोहोचले. २९ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजता तिघेही गणेशवाडी, काट्या मारुती चौक, दिंडोरी नाकामार्गे रामवाडीत पोहोचले. साळुंकेला जुन्या घराची आठवण आल्याने रामवाडीजवळ तिघे थांबले. तेव्हा संशयित बोरिसा व चोथवे तेथे उभे होते. त्यांनी साळुंकेकडे रागाने बघितल्यावर तिघेही निघून गेले.
Navi Mumbai Airport : फडणवीस म्हणालेले पहिल्या तिकिटावर दि बा पाटील यांचं नाव दिसेल, पण काल मोदींनी… सुपुत्र अतुल पाटलांची नाराजी
दोन तास थरार
रामवाडीतून तिघेही पहाटे १.३० वाजता विसे चौकात पोहोचले. कार थांबवून सचिन साळुंके लघुशंका करीत असताना भरधाव वेगाने दोन कार तेथे पोहोचल्या. त्यातून चोथवे आणि बोरिसा यांच्यासोबत आणखी १०-१२ जण होते. बोरिसाने साळुंकेचा गळा दाबून ‘मला खुन्नस देतो का? इथे कशाला आला, मला ठार मारायाला आला का? तुझी येथे येण्याची हिम्मत कशी झाली, तुला संपवून टाकतो’, असे म्हणाला.
बोरिसाने गावठी कट्ट्यातून साळुंकेच्या दिशेने दोन वेळा गोळी झाडली. तेव्हा झटापट करुन साळुंकेने जीव वाचवला. फायरिंगमुळे सांगळे कार घेऊन निघू लागला. ‘याचा ड्रायव्हर पळत आहे’, असे म्हणत बोरिसाने सांगळेच्या दिशेने झाडलेली गोळी कारच्या डिक्कीला लागली. बोरिसा व साथीदारांनी साळुंकेला बळजबरीने त्यांच्या कारमध्ये बसवले. सांगळे व जाधव यांनी त्या कारचा पाठलाग केला.
Murlidhar Mohol : अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळ यांचा शड्डू, दादा तीनवेळा अध्यक्षपद भूषवत असलेल्या निवडणुकीत उडी
केटीएचएम कॉलेजसमोरील पूलापर्यंत पोहोचल्यावर सांगळे कारमधून उतरुन पसरा झाला. तेव्हा बोरिसाच्या साथीदारांनी आमची कार रामवाडीत आणली. तेथे ‘याला जीवंत सोडू नका’, असे म्हणत चोथवेसह इतरांनी साळुंकेवर लोखंडी वस्तूने डोक्यावर वार केले. जाधवलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पहाटे ३.३० वाजता जखमींना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

