• Mon. Mar 9th, 2026
    Devendra Fadnavis: भाजपचे स्वबळ की महायुती? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नाशकात आढावा बैठक

    Devendra Fadnavis: उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रिंगणात उतरले आहेत.

    fadnavis news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: शिवसेना शिंदे गटाने नाशिकमधून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी (दि. १०) उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक होणार आहे. मंत्री, खासदार, आमदार, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगूल वाजला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. जानेवारीत महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
    Maharashtra Timesनागपुरात ओबीसींचा आज महामोर्चा; यशवंत स्टेडियम येथून सुरुवात, काय आहेत मागण्या?
    उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक होणार असून, त्यात निवडणुकांसदर्भातील नियोजन बंद दाराआड पदाधिकाऱ्यांना सांगितले जाणार आहे. पंचवटीतील स्वामीनारायण मंदिरातील सभागृहात सकाळी १० वाजेपासून बैठकीला सुरुवात होणार आहे.
    Maharashtra Timesफांद्या छाटताना मोठा अनर्थ; सिगरेटची ठिणगी पडून डिझेल कॅनचा स्फोट, नाशकात 6 जण होरपळले
    निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र
    नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार, मंत्री तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या तीन तासांच्या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्याला अर्धा तासाचा वेळ देण्यात आला आहे. यात पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक जिंकण्याचा कानमंत्री फडणवीस आणि चव्हाण यांच्याकडून दिला जाणार आहे.

    स्वबळाचा नारा
    आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणून लढण्यात येणार असल्याचे महायुतीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत असले, तरी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती वेगळी आहे. पुणे महापालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत गेल्या निवडणुकीत झाली होती. त्यात भाजपने १०० जागा जिंकल्या होत्या. या परिस्थितीत महायुतीतील जागावाटप अडचणीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीत स्वबळावर, की महायुती म्हणून, याचीही चाचपणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा