• Tue. Jun 16th, 2026
    तलावाचं काम करण्यासाठी आले, त्याच तलावात पोहण्यासाठी जाणं पडलं महागात; दोघांचा बुडून मृत्यू

    Dharashiv Two People who Came to Swim and Died : धाराशिवमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या राज्यातून आलेल्या जोन तरुण मजुरांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे तलावात पोहण्यासाठी आले होते. मात्र, तिथे नियतीनं घात केला, पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा बुडून मृत्यू झाला.

    तुळजापूर तरुण मजुरांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रहीम शेख, धाराशिव : जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामुळे पांगरदरवाडी परिसरात खळबळ उडाली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पांगरदरवाडी येथिल उंचीवाढ साठवण तलाव येथे इलेक्ट्रिक सबस्टेशनचं काम सुरु असून त्या कामासाठी बाहेर राज्यातून काही मजूर येथे कामासाठी आलेले आहेत.

    आज बुधवारी सकाळी 11.30 ते 12.00 वाजण्याच्या सुमारास दोन तरुण मजूर तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या तलाव परिसरात एकाही ठिकाणी पाण्याच्या खोली संदर्भात किंवा धोक्याचा सूचना फलक दिसून आला नाही. राजेश रमेश विश्वकर्मा (रा.मध्य प्रदेश) व अखिलेश दयाशंकर गुप्ता (रा.उत्तर प्रदेश) अशी मयत तरुणांची नावे आहेत.

    Maharashtra TimesPune Crime : सचिन घायवळला शस्त्र परवाना देताना योगेश कदम यांनी काय म्हटलंय? EXCLUSIVE प्रत समोर

    घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, जुबेर काझी, समीर बागवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या पथकास एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. तर दुसरा मृतदेह खोल पाण्यात बुडाला होता. पोलीस कॉन्स्टेबल जुबेर काझी यांनी धाडस करून पाण्यात खोलवर जाऊन मृतदेह बाहेर काढला. दोघा तरुणांचा मृतदेह पाहून उपस्थितांच्या अंगावर देखील शहारे आले.

    Maharashtra TimesNagpur Crime : नागराज अण्णांनी रस्त्यावरुन उचलून स्टार केलं, पण ‘त्या’ सवयीने घात केला; ‘झुंड’मधल्या बाबूसोबत काय घडलं?

    बाप-लेकासह तिघांचा मृत्यू

    शेतीसंदर्भातील ऑनलाईचं काही कामकाज घेऊन बाप-लेक निघाले होते. काम आटोपून दोघेही हसत खेळत घराकडे परत निघाले. मात्र, मृत्यू त्यांच्यावर टपून होता. विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. या धडकेत बाप-लेक जागीच ठार झाले. तर दुसऱ्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूरमधील मूल-मारोडा मार्गावर घडली. यश शेंडे, देविदास शेंडे आणि वासुदेव सहारे असं मृतकांची नावं आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा