Malaria Patients In Maharashtra: सन २०२० ते सप्टेंबर २०२५पर्यंत मलेरियामुळे एकूण ११० जणांचा मृत्यू झाला. इतर कीटकजन्य आजारांच्या तुलनेमध्ये मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक आहे.
गडचिरोली, रायगड, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग, सातारा, भंडारा, वसई-विरार, मुंबई, पुणे महापालिका क्षेत्र, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मिरा-भाईंदर येथे मलेरियाच्या रुग्णांची संख्या अधिक आढळून आली. मुंबईमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत ८,००१ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. गडचिरोलीमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५,७६२ इतके होते. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक म्हणजे दहा, चंद्रपूरमध्ये दोन, तर भंडारा येथे एकाचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी
मलेरिया रुग्णांवर प्रतिबंध यावा, यासाठी विविधस्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहेत मलेरिया रुग्णांच्या शोधासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य संस्थेमार्फत सर्वेक्षण मोहीम राबवणे, तसेच ताप रुग्ण सर्वेक्षण, रक्तनमुन्यांचे संकलन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दैनंदिन कोडनंबरप्रमाणे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जाते.
प्रयोगशाळांची उपलब्धता
राज्यातील प्रत्येक आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्हा, तसेच ग्रामीण पातळीवरही प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणामुळे राज्यामध्ये कीटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या कीटकांचा प्रकार आणि प्रतिबंध अशा दोन्ही पातळ्यांवर माहिती मिळते. १० टक्के घरांमध्ये हे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येते.
हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; विधिमंडळ सचिवालयाकडून तात्पुरते वेळापत्रक जाहीर, कधीपसून होणार सुरु?
काय सांगतात आकडे?
वर्ष -मलेरिया रुग्ण -पीएफ रुग्ण -मृत्यू
२०२० —१२९०९ –६५७६ –१२
२०२१ —१९३०३ –११८६२ –१४
२०२२ —५४५१ –८९८३ –२६
२०२३ —१६१५९ –६२९७ –१९
२०२४ —२१०७८ –८८३२ –२६
२०२५ —१८३८१ –६७९७ –१३ (१ जानेवारी ते ३० सप्टेंबर अखेर)

