• Tue. Jun 9th, 2026
    ‘कमळाबाईने चिखल करुन…’, उद्धव ठाकरेंनी तोफ डागली, गाढव कुणाला म्हणाले?

    Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यांनी भाजवरही सडकून टीका केली. त्यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी यावेळी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा आज पार पडतोय. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसऱ्याच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. “सर्वांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. मी कितीवेळा बोलायचं, अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खऱ्या आयुष्याचं सोनं असतं. म्हणूनच अनेक पक्षांचा आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. त्यांना असं वाटलं की, काही जणांना त्यांनी पळवलं आहे, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याचकडे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    “आता घरुन येताना मी आजूनबाजून पाहत होतो. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर कितीही शाल टाका, गाढव ते गाढवच. जसा संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शाह यांच्या जोड्यांचं भार वाहणारं हे गाढव. जाऊद्या त्यांचे जोडे त्यांना लखलाभ. जनता पण मारणार एकदिवस, तो दिवसही लांब नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    “आज मुद्दाम ही सभा आणि हा मेळावा इथे घेतोय. अनेक जण सांगत होते की, मेळावा कसा घेणार, दरवर्षी घेतात तसा घेणार. मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालं आहे, त्याचं कारण कमळाबाई. कमळाबाईच्या कारभाराने स्वत:ची कमळे फुलवून घेतली आहे. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करुन दिलाय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    “शेतकऱ्याच्या घरादाराचं चिखल झालं आहे. शेती वाहून गेली आहेच, पण घरादारातही चिखल झाला आहे. शेतकरी आज विचारतोय आम्ही खायचं काय, ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. मराठवाडा आपत्तीग्रस्त झाला आहे. मी शिवसैनिकांना आवाहन करतो. हे संकट फार मोठं आहे. जे करता येईल ते फूल नाहीतर फुलाची पाकळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देऊ. ते करायला पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

    “माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा. आता ते मुख्यमंत्री असताना बोलत आहेत की, ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही. सगळे निकष बाजूला ठेवा आणि सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत केलीच पाहिजे. ज्या प्रमाणे आपल सरकार असताना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी कर्जमुक्ती करा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा