Parbhani Youth Ends Life For OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपलं असं वाटून एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. हे माझं माझ्या समाजासाठी बलिदान आहे, असं त्याने अखेरच्या पत्रात लिहिलं.
याविषयी विस्तृत माहिती अशी की परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथील कुमार नारायण आघाव या 22 वर्षीय तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. ही माहिती कळतात आजूबाजूचे नागरिक जमा झाले. पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी त्याच्या कपड्याची झडती घेतली असता त्याच्या कपड्यांमध्ये एक पत्र आढळून आलं.
Chandrapur News: NEET परीक्षेत यश, पण डॉक्टर नाही व्हायचं; प्रवेशाच्या दिवशीच MBBS विद्यार्थ्याने जीवन संपवलं, चंद्रपुरात खळबळ
या पत्रात कुमार आघावने लिहिले होते की, ओबीसींचे आरक्षण संपले आहे आणि त्यामुळेच मला मागील काही दिवसापासून चैन पडत नाहीये. या आरक्षणाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच येणाऱ्या काळात आपल्या आयुष्याचे काहीतरी चांगले होईल असे वाटत होते. पण, आता हे आरक्षणच संपल्यामुळे आपले कसे होईल, आपल्या ओबीसी समाजाचे कसे होईल, अशी हुरहुर त्याला वाटू लागली. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याचा दृढ निश्चय त्याच्या मनामध्ये होता. शेवटी त्याने आपल्या समाजासाठी बलिदान देण्याचा निर्णय घेतला. काल तो सकाळी आपल्या शेताकडे निघाला. शेतात गेल्यानंतर दोरीच्या साह्याने शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरखंड बांधला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली. ओबीसीच्या आरक्षणासाठी मी माझे बलिदान देत असल्याचेही त्याने पत्रात लिहिले आहे.
एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा तरुण आपले आयुष्य संपवत आहोत, तर दुसरीकडे आता ओबीसी आरक्षण गेले म्हणून ओबीसी तरुणही टोकाटं पाऊल उचलत आहेत. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. नेमकं आरक्षण कोणाला आहे आणि कोणाला नाही हाच प्रश्न आता ग्रामीण भागातील तरुणांना पडला आहे. मराठा समाज म्हणतो ओबीसीत आमचा समावेश झाला, पण ओबीसींची प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी मिळत नाही, तर दुसरीकडे ओबीसी समाजाला असे वाटते की मराठा समाज ओबीसी मध्ये आला आणि आमचा आरक्षण संपलं. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

