Jalgaon News : व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या प्रकरणात विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या प्रकरणात जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल गुन्ह्यात विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते असून अजितदादांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जातात. या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर ही अटक झाली आहे. विनोद देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात व्यावसायिक असलेले फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन, “अजित पवार यांच्या दबावामुळे पोलिस अटक करत नाहीत” असा गंभीर आरोप केला होता.
Vaibhav Khedekar : गाड्यांच्या ताफ्यासह मनसेचा बडतर्फ नेता कोकणातून मुंबईत, पण भाजप प्रवेशाची गाडी दुसऱ्यांदा अडली, WhatsApp स्टेटस चर्चेत
या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांतच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, त्यांच्या अटकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता अजित पवार या प्रकरणी काही भाष्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.
Manoj Jarange: त्रास दिला तर अजित पवारांचा कार्यक्रम झाला समजा; मनोज जरांगेंंचा धनंजय मुंडेंना इशारा
Arun Dongale : चर्चा शिवसेना प्रवेशाची, पण चार मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘घड्याळ’ बांधलं, ‘गोकुळ’च्या संचालकांमुळे शंभर हत्तीचं बळ
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा
दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांची पेरणी ते विक्री प्रक्रिया अधिक सुलभ आणि समन्वयाने करण्यासाठी कृषी व पणन विभागाचे कृती दल स्थापन करण्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी केली. ‘शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची पेरणी करावी जेणेकरून पिकाला विक्रीपश्चात अधिक भाव मिळेल. हवामान अंदाज, शेतमालाची विक्री हे सर्व मार्गदर्शन करावे यासाठी पीक काढणी मार्गदर्शक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल,’ असे भरणे यांनी सांगितले.

